शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

मनाशी मैत्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 22:05 IST

एखाद्या अस्वस्थ माणसाला तुम्ही काहीही सांगितले तरी तो म्हणेल ठीक आहे.

- वैदेही जंजाळे

नको रे मना, क्रोध हा खेदकारी नको रे मना, काम नाना विकारीनको रे मना, सर्वदा अंगिकारनको रे मना, मत्सरु दंभभारू

मन:शांती जीवन जगताना अत्यंत गरजेची असलेली मनाची अवस्था चांगली असावी लागते. खरेतर जेव्हा मन अस्वस्थ असते तेव्हा उत्तर काहीही असले तरी मन थाऱ्यावर येत नाही. या उलट जर मन शांती आणि ध्यान जागेवर असेल त्यावेळी एक पुसटशी खूण मिळाली तरी तुम्हाला तुमचे उत्तर प्राप्त होते. 

जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही स्वत: सोबत, स्वत:च्या विचारांसोबत असता, त्यावेळी तुम्हाला तुमचे उत्तर नक्कीच मिळते. प्रश्न व अडचण कितीही मोठी असो, काही काळ निवांत स्वत: सोबत वेळ घालविणे गरजेचे आहे.

एखाद्या अस्वस्थ माणसाला तुम्ही काहीही सांगितले तरी तो म्हणेल ठीक आहे. पण त्याची मनाची अस्वस्था व त्यात येणारे असंख्य विचार त्याला विचलीत करत असतात. हे अशा मनाचे लक्षण आहे ज्यात इतक्या कल्पना भरलेल्या असतात की नवीन ज्ञान किंवा माहिती आत शिरायलाही जागा नसते. मन:शांतीसाठी काही गोष्टी आजच्या धकाधकीच्या, तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक आहेत.

मनाला स्थिर होण्यासाठी तयार करा - आपल्या मनात येणाऱ्या अनियंत्रित विचारांनी अनावर मनामुळे आपली प्राण उर्जा निघून जाते आणि आपण निराश व विफल होतो. मग अशा सैरभैर झालेल्या मनाला स्थिर, शांत करणे गरजेचे असते. आपण प्रत्यक्षपणे मन:शांती मागू किंवा प्राप्त करू शकत नाही. मात्र, मनाला शांत, स्थिर होण्यासाठी तयार नक्की करू शकतो. ध्यान धारणा ही त्यामुळेच अत्यंत गरजेची झालीय.

प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्या -जेव्हा अनावर कठीण प्रसंग येतात तेव्हा तुमच्या मनाचे निरीक्षण केलंय का कधी? अशा वेळी मनामध्ये भावनांचा उद्रेक होतो आणि मन बेचैन होऊन आपण प्रतिक्रीया व्यक्त करण्यास सुरुवात करतो. अशा बहुतांश वेळी मनामध्ये भावनांचा उद्रेक होतो. आपण भावनावश होतो. सतत विचार करतो की असे का घडले? आपल्या सोबतच का घडले? मी काय केले? अशा वेळी मी काय करायला पाहिजे? हा विचार करणे परिस्थितीला दर्जात्मक व आशावादी प्रतिसाद देणे गरजेचे असते.

शांत रहा, निर्णय चुकणार नाहीत - भोवतालच्या परिस्थितीवर आपण मात करू शकत असल्याची आपली क्षमता खूप प्रभावशाली असते. आपले मन आणि देवाने दिलेली बुद्धी ''ब्रेन" हे एक अत्यंत म्हणजे अति संवेदनशील व पावरफूल देणगी आहे. त्यावर जर प्रभुत्व मिळविले तर कठिणातला कठीण प्रसंगाला तोंड देण्याची शक्ती प्राप्त होते. त्यासाठी ध्यानधारणा, योगसाधना अत्यंत महत्वाचे अंग आहेत.

१. ध्यान आपल्याला मानसिक सशक्त बनवतो. ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला स्थिर ठेवू शकतो.२. भावनिक स्थैर्य प्राप्त होते.३. प्रतिक्रिया व्यक्त न करता, प्रतिसाद देण्याची क्षमता प्राप्त होते. ४. आपण स्वत:सोबत भेटण्यास वेळ काढतो.५. स्वत:ची वैचारिक पातळी वाढवतो व निर्णय घेण्यास सक्षम होतो.६. ध्यान लावल्याने तुमचे ध्यान कुठे भटकत नाही.

अत्यंत निराक्ष वाटते तेंव्हा काय करावे?१. स्वत:ची जागा बदला. ( उदा. ज्या जागेवर असाल तेथून उठा व जागा बदला) Change Your Physiology२. आवडीचे संगीत लावा.३. ज्या संगीतात मन रमते अथवा. Mood Changing Music४. अशा वेळेस उपास अथवा Low Sound Track ऐकू नये.५. ज्या गोष्टीमुळे नैराश्य आलय त्या लिहून काढा.६. प्रत्येक गोष्टीसाठी ३ मार्ग शोधून काढा.७. स्वत:ची भाषा बदला Change Your Linguistic

उदा. माझे काम होईल का? माझे काम झालेल आहे, असे बोला व तेच visualize करा. लक्षात ठेवा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही नक्कीच जो हवा तसा बदल घडवून स्वत:चे आयुष्य बदलवू शकता. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक