शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१ सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरूवात होणार; नियम, विधी आणि महत्व जाणून घ्या एका क्लिकवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 16:25 IST

देवाघरी गेलेल्या कुटुंबातील माणसांना शांती मिळावी, यासाठी उद्यापासून सुरू होत असलेल्या  पितृपक्षाचे काही नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

पितृपक्षादरम्यान देवाघरी गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या संतुष्टीसाठी, शांती मिळण्यासाठी श्राध्द केले जाते. हा विधी व्यवस्थित केला नाही  पित्र असंतुष्ट राहतात असं मानलं जातं. परिणामी व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. देवाघरी गेलेल्या कुटुंबातील माणसांना शांती मिळावी, यासाठी उद्यापासून सुरू होत असलेल्या  पितृपक्षाचे काही नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

पित्रांना संतुष्ट करण्यसाठी जेवण तसंच पिंडदान केलं जातं. त्यांना शांती मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू पंचांगानुसार पितृ पक्ष अश्विनमास कृष्ण पक्षात असतो.  याची सुरूवात पोर्णिमेपासून होते आणि आमावस्येला शेवट होतो. साधारणपणे  १६ दिवसांचा पितृपक्ष असतो. १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत हा कालावधी असणार आहे. 

दिवंगत व्यक्तीच्या मृत्यूच्या तिथीलाच श्राद्ध केलं जातं.  ज्या व्यक्तीचा दुर्घटनेत किंवा आत्महत्येनं मृत्यू झाला आहे. अशा व्यक्तीचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं. दिवंगत वडीलांचे श्राद्ध अष्टमी आणि दिवंगत आईचे श्राद्ध नवमीच्या दिवशी केलं जातं. जर कुटुंबातील व्यक्तींची मृत्यूची तिथी माहिती नसेल तर श्राद्ध आमावस्येला केलं जातं. सौभाग्यवती महिलेचा मृत्यू झाला असल्यास श्राद्ध नवमीला केलं जातं. सन्यासीचे श्राद्ध द्वादशीच्या दिवशी केलं जातं. 

पितृपक्षात पिंडदान केलं जातं. शिजवलेला भात, तिळ, दूध मिसळून पिंड तयार केली जाते. पिंडाला शरीराच्या प्रतिकाप्रमाणे पाहिलं जातं. पितृपक्षात कोणतंही शुभ कार्य, पूजाविधी करू नये. देवी देवतांची  रोजची पूजा बंद न करता . फक्त ज्या दिवशी श्राद्ध असेल तेव्हा पूजा करू नये. मोठ्या प्रमाणावर लोक या कालावधीत नवीन दागिने, सामान विकत घेत नाहीत.

श्राद्धाच्या दिवशी पूर्वजांच्या आवडीचे जेवण तयार केले जाते. अनेकजण या जेवणात कांदा लसणाचा वापर करत नाहीत. या दिवसात गाय, कावळा, कुत्रा, मुंग्यांना जेवण दिलं जातं. अनेक विधी करून झाल्यानंतर घरांमध्ये ब्राम्हणांना जेवण दिले जाते. त्यानंतर  नकळतपणे झालेल्या चुकांबाबत माफी मागितली जाते. पित्रांना  जेवण दिल्यानंतर, कावळ्यांना जेवण दिल्यानंतर संपूर्ण कुटुंबातील व्यक्ती  जेवण ग्रहण करू शकतात.

हे पण वाचा-

युद्ध जिंकणार! भारतानं आखला कोरोना लसीचा 'ग्लोबल प्लॅन'; पाक वगळता इतर देशांना होणार फायदा

दिवसभरातून तुम्ही कितीवेळा श्वास घेता आणि सोडता? वाचा श्वसनाबाबत माहीत नसलेल्या गोष्टी

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष