शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१ सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरूवात होणार; नियम, विधी आणि महत्व जाणून घ्या एका क्लिकवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 16:25 IST

देवाघरी गेलेल्या कुटुंबातील माणसांना शांती मिळावी, यासाठी उद्यापासून सुरू होत असलेल्या  पितृपक्षाचे काही नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

पितृपक्षादरम्यान देवाघरी गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या संतुष्टीसाठी, शांती मिळण्यासाठी श्राध्द केले जाते. हा विधी व्यवस्थित केला नाही  पित्र असंतुष्ट राहतात असं मानलं जातं. परिणामी व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. देवाघरी गेलेल्या कुटुंबातील माणसांना शांती मिळावी, यासाठी उद्यापासून सुरू होत असलेल्या  पितृपक्षाचे काही नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

पित्रांना संतुष्ट करण्यसाठी जेवण तसंच पिंडदान केलं जातं. त्यांना शांती मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू पंचांगानुसार पितृ पक्ष अश्विनमास कृष्ण पक्षात असतो.  याची सुरूवात पोर्णिमेपासून होते आणि आमावस्येला शेवट होतो. साधारणपणे  १६ दिवसांचा पितृपक्ष असतो. १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत हा कालावधी असणार आहे. 

दिवंगत व्यक्तीच्या मृत्यूच्या तिथीलाच श्राद्ध केलं जातं.  ज्या व्यक्तीचा दुर्घटनेत किंवा आत्महत्येनं मृत्यू झाला आहे. अशा व्यक्तीचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केलं जातं. दिवंगत वडीलांचे श्राद्ध अष्टमी आणि दिवंगत आईचे श्राद्ध नवमीच्या दिवशी केलं जातं. जर कुटुंबातील व्यक्तींची मृत्यूची तिथी माहिती नसेल तर श्राद्ध आमावस्येला केलं जातं. सौभाग्यवती महिलेचा मृत्यू झाला असल्यास श्राद्ध नवमीला केलं जातं. सन्यासीचे श्राद्ध द्वादशीच्या दिवशी केलं जातं. 

पितृपक्षात पिंडदान केलं जातं. शिजवलेला भात, तिळ, दूध मिसळून पिंड तयार केली जाते. पिंडाला शरीराच्या प्रतिकाप्रमाणे पाहिलं जातं. पितृपक्षात कोणतंही शुभ कार्य, पूजाविधी करू नये. देवी देवतांची  रोजची पूजा बंद न करता . फक्त ज्या दिवशी श्राद्ध असेल तेव्हा पूजा करू नये. मोठ्या प्रमाणावर लोक या कालावधीत नवीन दागिने, सामान विकत घेत नाहीत.

श्राद्धाच्या दिवशी पूर्वजांच्या आवडीचे जेवण तयार केले जाते. अनेकजण या जेवणात कांदा लसणाचा वापर करत नाहीत. या दिवसात गाय, कावळा, कुत्रा, मुंग्यांना जेवण दिलं जातं. अनेक विधी करून झाल्यानंतर घरांमध्ये ब्राम्हणांना जेवण दिले जाते. त्यानंतर  नकळतपणे झालेल्या चुकांबाबत माफी मागितली जाते. पित्रांना  जेवण दिल्यानंतर, कावळ्यांना जेवण दिल्यानंतर संपूर्ण कुटुंबातील व्यक्ती  जेवण ग्रहण करू शकतात.

हे पण वाचा-

युद्ध जिंकणार! भारतानं आखला कोरोना लसीचा 'ग्लोबल प्लॅन'; पाक वगळता इतर देशांना होणार फायदा

दिवसभरातून तुम्ही कितीवेळा श्वास घेता आणि सोडता? वाचा श्वसनाबाबत माहीत नसलेल्या गोष्टी

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष