शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

बदलती मनोवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 9:32 AM

मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमुलगा वर्षभर अभ्यास करतो. पण परीक्षा जवळ आल्या की मानसिक ताण घेतो. स्वत:चा स्वत:वर विश्वास नसला की, अशी मनोवस्था होते. अभ्यास हा आत्मविश्वासाने केला पाहिजे. मनापासून केला पाहिजे. स्मरणात ठेवला पाहिजे. मनावर घेऊन केलेल्या अभ्यासात आपली प्रगती दिसते. अभ्यासात ‘मन’ लागत नाही, अशा काही मुलांच्या तक्रारी असतात. काही मुले मन लावून अभ्यास करतात. यात ज्याच्या - त्याच्या बुद्धीनुसार, बुद्ध्यांकावरून त्यांची मनोवस्था बदलत जाते. मनावर घेऊन अभ्यास केल्यास बुद्ध्यांक उंचावतो. मनाला प्रसन्न ठेवणे अवघड काम आहे. पण प्रसन्न मनाने केलेला अभ्यास लक्षात राहतो. परीक्षा म्हटले की ताण येतोच! कारण ती परीक्षाच असते. इथे सतत जागृत अवस्थेत राहणे महत्त्वाचे असते. जागृत ‘मन’ आपल्या सवयींना बदलवते. मनाची अवस्था सतत बदलत राहणे हीच त्याची मूळ भूमिका असते. कारण ‘मन’ स्थिर राहूच शकत नाही. कारण त्याचे स्थिरपण फक्त ईशचरण एवढेच असते. म्हणून तर संत तुकाराम महाराजांनी सांगितले. ‘‘आता कोठे धावे मना तुमचे चरण देखलिया’’ ‘मन’ एकदा त्या ईश्वराच्या चरणाशी रत झाले की मग कुठेही धाव घेत नाही. तोेपर्यंत ते मन कुणाच्या आज्ञेत राहत नाही. मनाचे मालक मनच असते. कारण मनाला शक्ती बुद्धी देते. बुद्धीचा आत्मा. आत्म्याचे औदार्य मनावरच अवलंबून असते. मनाचे सुंदरपण त्या आत्मस्थितीवर निर्भर असते.आत्म्याची स्थिती जशी असते, त्यानुसार मनाचे भाव बदलत जातात. परीक्षेला जाणारा मुलगा - सासरला जाणारी नववधू (मुलगी), यांचे भाव जवळपास सारखे असतात. इकडे परीक्षेला जाणाऱ्या मुलांचा पेपर छान गेला की भाव बदलतात. परीक्षेला जाण्यापूर्वीचे मन अन् नंतर पेपर छान गेल्यानंतरचे मन यात फरक आहे. तसेच सासरला जाण्यापूर्वीचे ‘मन’ अन् सासरला गेल्यास सासरच्या लोकांचे प्रेमाने भारावून गेलेले मन यात नक्कीच फरक असतो. मनाला नेहमी चांगले विचार करण्याची सवय लावा. ‘मन’ सुख-दु:खात बदलते. मनाची मनोवस्था ही बदलत जाणारी आहे. म्हणून संतांनीसुद्धा ‘मनालाच’ मोठेपण दिले आहे. मन गुरु, मन शिष्य, सर्वस्व ‘मना’वरच अवलंबून आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक