वसईतील हत्येप्रकरणी पाच जणांना धुळ्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 05:32 AM2017-10-04T05:32:56+5:302017-10-04T05:33:28+5:30

वसईत गरब्याच्या वादातून एकाची हत्या करून पसार झालेल्या पाच जणांना धुळे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्यावर अटक केली.

Five suspects arrested in Vasai murder case | वसईतील हत्येप्रकरणी पाच जणांना धुळ्यात अटक

वसईतील हत्येप्रकरणी पाच जणांना धुळ्यात अटक

Next

वसई: वसईत गरब्याच्या वादातून एकाची हत्या करून पसार झालेल्या पाच जणांना धुळे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्यावर अटक केली.
याआधी वालीव पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. नवरात्रात गरबा खेळण्यावरून झालेल्या दोन गटात झालेल्या वादात जमावाच्या हल्ल्यात अजय झा ठार झाले. तर पाच जण जखमी झाले होते. वालीव पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी मारेकºयांना पकडण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली होती. तसेच आरोपींना पकडण्यासाठी त्यांची माहिती राज्यातील पोलीस ठाण्यांना दिली होती.
त्याआधारे धुळे पोलिसांनी लळींग येथील टोल नाक्यावर झा हत्या प्रकरणातील नरसिंह रमेश आदवळे (२१), अभिषेक नरेंद्र प्रतापसिंह (१९), प्रतिक अरविंद गुप्ता (१९), धीरज दीनानाथ सिंग (१९), मोहम्मद सोहेब सिद्दीकी (२३) यांना अटक केली. हे पाचही आरोपी उत्तर प्रदेशात पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आली.

Web Title: Five suspects arrested in Vasai murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.