१६ आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णयाला किती वेळ लागेल? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 06:16 PM2023-05-11T18:16:55+5:302023-05-11T18:17:53+5:30

Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर राहुल नार्वेकर यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

maharashtra assembly speaker rahul narvekar reaction over supreme court verdict on maharashtra political crisis | १६ आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णयाला किती वेळ लागेल? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले

१६ आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णयाला किती वेळ लागेल? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले

googlenewsNext

Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis: एकनाश शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. यावेळी निरीक्षणे नोंदवताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट, राज्यपाल यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मात्र, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बचावल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात परतल्यावर ते याप्रकरणी कार्यवाही करतील, असे सांगितले जात आहे. राहुल नार्वेकर आता याप्रकरणी काय निकाल देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.   

१६ आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णयाला किती वेळ लागेल?

आमदारांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो, हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नमूद केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. येत्या काळात यावर सुनावणी घेऊ. आम्ही याप्रकरणी लवकारत लवकर योग्य तो निर्णय घेऊ. परंतु त्याआधी इतर कार्यवाही पूर्ण करावी लागेल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वांत आधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व नेमके कोण करते याचा निर्णय घ्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने तसे सांगितले आहे. त्यामुळे सर्वांत आधी यावर निर्णय घेतला जाईल. यावेळी सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला जाईल. संसदीय लोकशाहीला बळकट करणारा निर्णय घेतला जाईल. योग्य वेळेत आमदारांच्या पात्रतेसंदर्भात निकाल दिला जाईल, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली. 

दरम्यान, आमदारांच्या पात्रता-अपात्रतेआधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोण करत आहे. यावर निर्णय घेतला जाईल. यासाठी व्यवस्थित चौकशी केली जाईल. पक्षाची घटना काय म्हणतेय याचा विचार करून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नेमका किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे सर्व याचिकांवर सुनावणी घेतली जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

 

Web Title: maharashtra assembly speaker rahul narvekar reaction over supreme court verdict on maharashtra political crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.