Maratha Kranti Morcha : औरंगाबाद जिल्ह्यात २४ तास राहणार इंटरनेट बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:11 AM2018-07-24T11:11:13+5:302018-07-24T11:12:46+5:30

आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पहाटे ३ वाजल्यापासून २४ तासासाठी जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

Maratha Kranti Morcha: Internet connection banned in Aurangabad district for 24 hours | Maratha Kranti Morcha : औरंगाबाद जिल्ह्यात २४ तास राहणार इंटरनेट बंद 

Maratha Kranti Morcha : औरंगाबाद जिल्ह्यात २४ तास राहणार इंटरनेट बंद 

googlenewsNext

औरंगाबाद : आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पहाटे ३ वाजल्यापासून २४ तासासाठी जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

बंदच्या काळात सोशल मिडियावरून चुकीची माहिती अथवा अफवा पसरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी औरंगाबाद पोलिसांनी खबरदारीचा उपाय करत जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा २४ तासासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आज पहाटे ३ वाजेपासून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची माहिती पोलीस उपयुक्त दिपाली धाटे-घाडगे यांनी दिली आहे. यासोबतच आज दिवसभराच्या परिस्थितीनुसार इंटरनेट बंदी आणखी वाढवली जाऊ शकते अशी माहितीही त्यांनी दिली आहे. 
 

Web Title: Maratha Kranti Morcha: Internet connection banned in Aurangabad district for 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.