बेळगावमध्ये अपघातात औरंगाबादचे ७ तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 02:11 AM2019-06-03T02:11:27+5:302019-06-03T02:11:37+5:30

कारचे टायर फुटले : गोव्याच्या वाटेवर असताना काळाचा घाला

Aurangabad 7 Tigers in Belgaum | बेळगावमध्ये अपघातात औरंगाबादचे ७ तरुण ठार

बेळगावमध्ये अपघातात औरंगाबादचे ७ तरुण ठार

googlenewsNext

बेळगाव : भरधाव कारचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात औरंगाबादचे सात तरुण ठार झाले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगावजवळ महामार्गावर हा अपघात घडला. हे सर्व तरुण गोव्याकडे जात होते.

नंदू किशनराव पवार (२८), अमोल निले (२६), सुरेश कन्हेरे (२९), अमोल रमेश चावरे (२६), महेश चावरे (२८), महेश नंदू कडाले, गोपीनाथ कडोबा वरकड (वय २७, सर्वजण रा. औरंगाबाद) अशी दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. ट्रकच्या धडकेने कारचा चक्काचूर झाला. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत महेश कडाले व गोपीनाथ वरकड यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी सर्वांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बेळगावमार्गे गोव्याला जात होते.

दौलताबाद, शरणापूर येथे शोककळा
दुर्घटनेमुळे दौलताबाद व शरणापूर गावांवर शोककळा पसरली आहे. तरुणांचे नातेवाईक व काही ग्रामस्थ तातडीने बेळगावकडे रवाना झाले आहेत. गोपी, महेश व सुरेश हे तिघे विवाहित होते. चौघे अविवाहित आहेत.

Web Title: Aurangabad 7 Tigers in Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.