शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

‘झेडपी’ची सत्ता दोलायमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:20 IST

विधानपरिषद निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान झाली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडे काठावरील बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देविधानपरिषद निवडणुकीचा परिणाम : यापुढे सत्तांतर ठरणार अटळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानपरिषद निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान झाली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडे काठावरील बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे.मतदारांनी कोणत्याही पक्षाच्या पदरात स्पष्ट बहुमताचे दान न टाकल्याने गेल्यावेळी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्षाने मिळून सत्ता प्राप्त केली. त्यावेळी पुसद परिसरातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी नाराजीचा सूर आळविला होता. मात्र नेत्यांनी दिलेल्या सुचनेबरहुकम त्यांनी त्यावेळी शांत राहणे पसंत केले. परिणामी काँग्रेसकडे अध्यक्ष व एक सभापती पद, तर भाजपाकडे उपाध्यक्ष आणि एक सभापतीपद आले. राष्ट्रवादी आणि अपक्षाच्या वाट्याला प्रत्येकी एक सभापतीपद आले. गेल्या वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यातूनच राष्ट्रवादीच्या ११ पैकी १० सदस्यांनी थेट गटनेताच बदलविण्याची भूमिका घेतली. त्यात ते यशस्वीही झाले.सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच सभेपासून काँग्रेसच्या एक सदस्य वारंवार सत्ताविरोधी भूमिका घेताना दिसून येतात. काँग्रेसच्या अनुभवी सभापतींनाही प्रबळ दावेदार असताना अध्यक्षपद नाकारल्यामुळे वणी, मारेगाव परिसरात नाराजीचा सूर आहे. गेल्यावेळी सत्ता स्थापन करताना केवळ अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधील माजी मंत्र्यांच्या गटाने पक्षाला चक्क भाजपाच्या दावणीला बांधले. यामुळेही पक्षात नाराजी कायम आहे.आता नुकतीच विधानपरिषदेची बिनविरोध निवडणूक झाली. त्यात पुसदला लॉटरी लागली. तेथील दोन युवकांना भाजप आणि काँग्रेसने आमदारकीची संधी दिली. परिणामी पुसदमध्ये तीन आमदार झाले. या सर्वांवरच आपापल्या पक्षवाढीची जबाबदारी आहे. यातूनच जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीच्या दहा सदस्यांनी गटनेता बदलवून सत्ताधारीविरोधी भूमिका घेतली आहे. काँग्रेसमधील काही सदस्य सुरूवातीपासूनच सत्तेच्या विरोधात दिसून येत आहे. यामुळे सर्वाधिक २० सदस्य असलेल्या शिवसेनाला सोबत घेऊन पुढीलवेळी सत्तांतर अटळ दिसत आहे. प्रभावी पदाधिकाºयांअभावी तूर्तास जिल्हा परिषदेमधील सत्ता दोलायमान दिसून येत आहे.नवीन पदाधिकारी निवडीसाठी दीड वर्षांचा अवधीपुढील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी केवळ दीड वर्षांचा अवधी बाकी आहे. या दीड वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे पुसदला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. तेथील तिनही आमदार कोणती भूमिका घेतात, काँग्रेसचे धुरीण पुन्हा पक्षविरोधी भूमिका घेतात का, भाजप नेमके काय करणार आणि पुसदचा बंगला निर्णायक भूमिका घेणार का, यावरच पुढील पदाधिकाºयांची निवड अवलंबून असणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदVidhan Parishadविधान परिषद