शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

‘झेडपी’ची सत्ता दोलायमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:20 IST

विधानपरिषद निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान झाली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडे काठावरील बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देविधानपरिषद निवडणुकीचा परिणाम : यापुढे सत्तांतर ठरणार अटळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानपरिषद निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान झाली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडे काठावरील बहुमत असल्याचे स्पष्ट होत आहे.मतदारांनी कोणत्याही पक्षाच्या पदरात स्पष्ट बहुमताचे दान न टाकल्याने गेल्यावेळी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्षाने मिळून सत्ता प्राप्त केली. त्यावेळी पुसद परिसरातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी नाराजीचा सूर आळविला होता. मात्र नेत्यांनी दिलेल्या सुचनेबरहुकम त्यांनी त्यावेळी शांत राहणे पसंत केले. परिणामी काँग्रेसकडे अध्यक्ष व एक सभापती पद, तर भाजपाकडे उपाध्यक्ष आणि एक सभापतीपद आले. राष्ट्रवादी आणि अपक्षाच्या वाट्याला प्रत्येकी एक सभापतीपद आले. गेल्या वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यातूनच राष्ट्रवादीच्या ११ पैकी १० सदस्यांनी थेट गटनेताच बदलविण्याची भूमिका घेतली. त्यात ते यशस्वीही झाले.सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच सभेपासून काँग्रेसच्या एक सदस्य वारंवार सत्ताविरोधी भूमिका घेताना दिसून येतात. काँग्रेसच्या अनुभवी सभापतींनाही प्रबळ दावेदार असताना अध्यक्षपद नाकारल्यामुळे वणी, मारेगाव परिसरात नाराजीचा सूर आहे. गेल्यावेळी सत्ता स्थापन करताना केवळ अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधील माजी मंत्र्यांच्या गटाने पक्षाला चक्क भाजपाच्या दावणीला बांधले. यामुळेही पक्षात नाराजी कायम आहे.आता नुकतीच विधानपरिषदेची बिनविरोध निवडणूक झाली. त्यात पुसदला लॉटरी लागली. तेथील दोन युवकांना भाजप आणि काँग्रेसने आमदारकीची संधी दिली. परिणामी पुसदमध्ये तीन आमदार झाले. या सर्वांवरच आपापल्या पक्षवाढीची जबाबदारी आहे. यातूनच जिल्हा परिषदेतील सत्ता दोलायमान होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीच्या दहा सदस्यांनी गटनेता बदलवून सत्ताधारीविरोधी भूमिका घेतली आहे. काँग्रेसमधील काही सदस्य सुरूवातीपासूनच सत्तेच्या विरोधात दिसून येत आहे. यामुळे सर्वाधिक २० सदस्य असलेल्या शिवसेनाला सोबत घेऊन पुढीलवेळी सत्तांतर अटळ दिसत आहे. प्रभावी पदाधिकाºयांअभावी तूर्तास जिल्हा परिषदेमधील सत्ता दोलायमान दिसून येत आहे.नवीन पदाधिकारी निवडीसाठी दीड वर्षांचा अवधीपुढील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी केवळ दीड वर्षांचा अवधी बाकी आहे. या दीड वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील चित्र पूर्णपणे पालटण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे पुसदला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. तेथील तिनही आमदार कोणती भूमिका घेतात, काँग्रेसचे धुरीण पुन्हा पक्षविरोधी भूमिका घेतात का, भाजप नेमके काय करणार आणि पुसदचा बंगला निर्णायक भूमिका घेणार का, यावरच पुढील पदाधिकाºयांची निवड अवलंबून असणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदVidhan Parishadविधान परिषद