शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गुवाहाटीचे विमान खुणावतेय.. पण तिकिटाचे पैसेच नाही! गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आले धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 10:59 IST

आयआयटीसाठी निवड, जाण्याची तयारी पण..

अविनाश साबापुरे

यवतमाळ : गुवाहाटी म्हटले की महाराष्ट्राला शिवसेनेतील उलथापालथच आठवते. रातोरात आमदार विमानात बसून गुवाहाटीला गेले. पण याच महाराष्ट्रातील एका गुणवान विद्यार्थ्याची गुवाहाटीच्या आयआयटीसाठी निवड झाली अन् त्याच्याकडे गुवाहाटीत पोहोचण्याची सोयच नव्हती. कोणतेच सरकार त्याच्या मदतीसाठी नाही आले. शेवटी त्याला जिल्हा परिषद शाळेत शिकविणारे गुरुजीच धावून आले. त्यांनी वर्गणी केली अन् तिकिटाचीच नव्हेतर जेवणा-राहण्याच्या खर्चाचीही सोय करून दिली.

काय घडले नेमके अन् कोण तो विद्यार्थी? रोजमजुरी करून जीवन जगणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेल्या संदेश जोगदंडे या विद्यार्थ्याची ही संघर्षगाथा आहे. पुसद तालुक्यातल्या दगडधानोरा हे त्याचे छोटेसे खेडेगाव. जिल्हा परिषद शाळेत शिकल्यावर गुणवत्तेच्या बळावर तो नवोदयमध्ये पोहोचला. आता बारावीनंतर त्याची निवड थेट गुवाहाटीच्या देशातील नामवंत आयआयटीमध्ये झाली आहे. आपल्या लेकाची इतक्या मोठ्या संस्थेत निवड झाल्याचे कळल्यावर आईवडिलांना जसा आनंद झाला, तसाच त्यांच्यापुढे अडचणीचा डोंगरही उभा राहिला. कारण निवड तर झाली, पण पोराला पाठवायचे कसे? जवळ छदामही नाही.

गावातील ज्या झेडपी शाळेत संदेश शिकला, त्याच शाळेतील मुख्याध्यापक सुधीर भुस्कुटे, मंगेश टिकार, सदानंद गिरी, बाजूच्या शेंबाळपिंपरी गावातील शिक्षक शुद्धोधन कांबळे यांच्या कानावर ही वार्ता गेली. त्यांनी लगेच पुसदचे बीडीओ गजानन पिल्लेवाड, गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांची भेट घेतली. संदेशसाठी काही मदतीचा स्रोत आपण उभा करू शकतो का, या विषयावर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी लगेच एक बैठक घेतली. अन् क्षणात एक भरघोस मदत नगदी स्वरूपात उभी राहिली. संदेश जोगदंड या विद्यार्थ्याला लगेच बीडीओंच्या कक्षात बोलावून त्याला मदत देण्यात आली.

सोशल मीडियाचा सकारात्मक वापर

पंचायत समितीमध्ये बैठक घेऊन मदत देण्यासोबतच मंगेश टिकार, शुद्धोधन कांबळे या शिक्षकांनी व्हाॅट्सॲप ग्रुपवर मदतीसाठी आवाहन करणारे मेसेज टाकले. त्यातूनही संदेश जोगदंड या विद्यार्थ्याला भरघोस मदत मिळाली. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर किती उपयुक्त ठरू शकतो, हेही या शिक्षकांनी दाखवून दिले. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत मदतीसाठी समोर यावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांनी केले.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीसुद्धा उच्च गुणवत्ता प्राप्त करू शकतो. ग्रामीण भागात राहूनसुद्धा आकाशाला गवसणी घालता येते, हा संदेश संदेशच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचला आहे.

- गजानन पिल्लेवाड, गटविकास अधिकारी, पुसद

टॅग्स :Educationशिक्षणSocialसामाजिकStudentविद्यार्थीzpजिल्हा परिषदTeacherशिक्षक