शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

यवतमाळच्या ‘अमृत’ पाणीपुरवठा योजनेला भ्रष्टाचाराची गळती; ६ वर्षांच्या विलंबानंतरही योजना अपूर्ण

By विलास गावंडे | Updated: December 21, 2022 17:36 IST

कंत्राटदार शिरजोर, स्थानिक लोकप्रतिनिधींचे तोंडावर बोट

यवतमाळ : शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेला सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरले. मंजुरीपासून सहा वर्षे लोटली तरी हा प्रकल्प अपूर्ण आहे. मुख्यमंत्री, स्थानिक पालकमंत्री यांनी वेळोवेळी कठोर निर्देश देऊनही कामकाजात बदल झाला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींचेही तोंडावर बोट असल्याने कंत्राटदाराने सर्वांनाच दुर्लक्षित केले. योजनेच्या कामात अनुभव नसलेल्या राजकीय पक्षातील पोटकंत्राटदारांनी उखळ पांढरे केले. यातूनच ही योजना सहा वर्षे उलटल्यानंतरही केवळ ५० टक्के पूर्ण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब असतानाही शहरवासीयांना पाच ते सात दिवसांआड पाणी मिळत आहे. विधिमंडळ अधिवेशनात ही योजना पूर्णत्वासाठी ठोस निर्णय व्हावेत अशी अपेक्षा यवतमाळकरांना आहे.

यवतमाळ शहराकरिता बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणण्याची ही योजना आहे. ३०२ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेला २९ मार्च २०१७ रोजी सुरुवात करण्यात आली. ३० महिन्यांत योजना पूर्ण करायची होती. नाशिक येथील मे. पी. एल. आडके कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र, सुरुवातीपासूनच ही योजना वादग्रस्त ठरली आहे. १००० एम.एम.चे पाइप बोगस निघाले. अनेक ठिकाणी या पाइपच्या ठिकऱ्या उडाल्या. दुरुस्तीतच बहुतांश कालावधी गेला. याला जबाबदार कोण हे अजूनही निश्चित झाले नाही.

बेंबळा प्रकल्पावरून टाकळी फिल्टर प्लांटपर्यंत अखेर पाणी पोहोचले. यवतमाळातही शुद्ध पाणी आले. २४ तास पाणीपुरवठ्यासाठी साकारलेल्या योजनेतून आजही नळाला पाणी येण्यासाठी काही भागात पाच ते सात दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे झोनिंग झालेले नाही. या कामाला गती दिल्यास अवघ्या महिन्याभरात काम पूर्ण होऊ शकते. परंतु कंत्राटदार शिरजोर झाला आहे. अशी स्वत: त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या मजीप्राच्या यंत्रणेची ओरड आहे. या कंत्राटदारावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांनाही रेड सिग्नल मिळत आहे. वारंवार त्रुटी काढून प्रकरण लांबविले जात आहे. राजकीय पुढारी आणि काही अधिकाऱ्यांकडून पाठराखण होत असल्याने या कंत्राटदाराला आता शासनानेच वेसण घालावी अशा भावना यवतमाळकर व्यक्त करीत आहेत.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचे अल्टीमेटम झुगारले

‘अमृत’ याेजनेच्या कंत्राटदाराने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेले अल्टीमेटमही झुगारले. तत्कालीन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी तर तब्बल तीनवेळा या कंत्राटदाराला सांगूनही कामाला अपेक्षित गती देण्यात आली नाही. विद्यमान पालकमंत्री संजय राठोड आता यवतमाळकरांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमृत योजनेच्या कामाचा आढावा नियमितपणे घेतला जात आहे. ५० टक्के काम झाले आहे. पाणीपुरवठ्याच्या दिवसातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ

कंत्राटदाराने झोनिंगच्या कामाची गती वाढवावी, यासाठी वारंवार सूचना केल्या आहेत. परंतु ते गांभीर्याने घेत नाहीत. झोनिंग झाल्यास पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर होतील.

- प्रफुल्ल व्यवहारे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा यवतमाळ

टॅग्स :WaterपाणीYavatmalयवतमाळGovernmentसरकार