शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

राष्ट्रवादी लढविणार यवतमाळ, आर्णी विधानसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:12 IST

राज्यात कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. पुसद हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला आहेच. शिवाय यवतमाळ व आर्णी विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार कोणत्याही परिस्थितीत दिलाच जाणार, ......

ठळक मुद्देसंदीप बाजोरिया : जिल्ह्यात काँग्रेससोबत युती नकोच, वेगळी राजकीय चूल मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. पुसद हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला आहेच. शिवाय यवतमाळ व आर्णी विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार कोणत्याही परिस्थितीत दिलाच जाणार, असे राष्टÑवादीचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे.बाजोरिया गुरुवारी येथे पत्रपरिषदेत बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना राज्यसरकारचा पाठिंबा काढणार नाही, पण भाजपचा सेनेला बाहेरचा रस्ता दाखवू शकते. फार तर याच वर्षीच्या डिसेंबरपर्यंत निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. काँग्रेससोबत आघाडी करावी का, याबाबत पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, त्यानुसारच आम्ही वागू. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यातील स्थिती त्यांच्यापुढे नक्कीच ठेवू. काँग्रेस आम्हाला ज्या पद्धतीची वागणूक देत आहे, ते पाहाता किती दिवस आपण काँग्रेसला ‘सपोर्ट’ म्हणूनच काम करायचे, हा प्रश्नही विचारणार आहोत. वरिष्ठांनी आघाडी केलीच तर आर्णी, यवतमाळ, पुसद या तीन जागा मिळाल्याच पाहिजे, हा आमचा आग्रह राहील. आर्णीमध्ये डॉ. आरती फुपाटे यांच्या रूपाने आमच्याकडे उच्चशिक्षित उमेदवारही आहे. त्यामुळे अधिकृत असो किंवा अनधिकृत असो, आम्ही आर्णी आणि यवतमाळ या दोन जागा तर लढवणारच आहोत. पुसदचा प्रश्नच नाही. पण आर्णी आणि यवतमाळमध्ये मी स्वत: उमेदवार देईन आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदही लावेल, असे माजी आमदार बाजोरिया यांनी सांगितले.आघाडी झाल्यावर दरवेळी काँग्रेस आमच्या जागा घेते. ज्या वणीत सतत भाजपा निवडून येत आहे, तेथेही काँग्रेसच दावा करते. पण यावेळी आम्ही तसे होऊ देणार नाही. काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात सतत कारवाया सुरू आहेत. आम्हीही त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार आहोत. ज्यांनी राष्ट्रवादीत सर्व पदे भोगली, ते आता काँग्रेसच्या छत्राखाली जाऊन काहीतरी करण्याची धडपड करीत आहे. ज्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, ते आता शेतकरी संघर्ष समिती निर्माण करून आंदोलन करीत आहे, अशी टीकाही बाजोरिया यांनी केली. शेतकऱ्यांना बोंडअळीची नुकसान भरपाई जाहीर झाली, त्यासाठी राष्ट्रवादीने केलेले हल्लाबोल आंदोलनच कारणीभूत आहे, असा दावाही त्यांनी केला.शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे स्वतंत्र निवेदनशेतकºयांच्या मदतीसाठी आंदोलन करणाऱ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, शेतकरी संघर्ष समितीच्या चक्रीधरणे आंदोलनात राष्ट्रवादी सहभागी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्वतंत्रपणे जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे, अशी माहिती माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. विदर्भानंतर सध्या मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलन होणार आहे. त्यामुळे इतरांच्या बॅनरखाली आंदोलन करण्याची गरजच नाही, असे मत यावेळी आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केले.