शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

राष्ट्रवादी लढविणार यवतमाळ, आर्णी विधानसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:12 IST

राज्यात कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. पुसद हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला आहेच. शिवाय यवतमाळ व आर्णी विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार कोणत्याही परिस्थितीत दिलाच जाणार, ......

ठळक मुद्देसंदीप बाजोरिया : जिल्ह्यात काँग्रेससोबत युती नकोच, वेगळी राजकीय चूल मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. पुसद हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला आहेच. शिवाय यवतमाळ व आर्णी विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार कोणत्याही परिस्थितीत दिलाच जाणार, असे राष्टÑवादीचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे.बाजोरिया गुरुवारी येथे पत्रपरिषदेत बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना राज्यसरकारचा पाठिंबा काढणार नाही, पण भाजपचा सेनेला बाहेरचा रस्ता दाखवू शकते. फार तर याच वर्षीच्या डिसेंबरपर्यंत निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. काँग्रेससोबत आघाडी करावी का, याबाबत पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, त्यानुसारच आम्ही वागू. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यातील स्थिती त्यांच्यापुढे नक्कीच ठेवू. काँग्रेस आम्हाला ज्या पद्धतीची वागणूक देत आहे, ते पाहाता किती दिवस आपण काँग्रेसला ‘सपोर्ट’ म्हणूनच काम करायचे, हा प्रश्नही विचारणार आहोत. वरिष्ठांनी आघाडी केलीच तर आर्णी, यवतमाळ, पुसद या तीन जागा मिळाल्याच पाहिजे, हा आमचा आग्रह राहील. आर्णीमध्ये डॉ. आरती फुपाटे यांच्या रूपाने आमच्याकडे उच्चशिक्षित उमेदवारही आहे. त्यामुळे अधिकृत असो किंवा अनधिकृत असो, आम्ही आर्णी आणि यवतमाळ या दोन जागा तर लढवणारच आहोत. पुसदचा प्रश्नच नाही. पण आर्णी आणि यवतमाळमध्ये मी स्वत: उमेदवार देईन आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदही लावेल, असे माजी आमदार बाजोरिया यांनी सांगितले.आघाडी झाल्यावर दरवेळी काँग्रेस आमच्या जागा घेते. ज्या वणीत सतत भाजपा निवडून येत आहे, तेथेही काँग्रेसच दावा करते. पण यावेळी आम्ही तसे होऊ देणार नाही. काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात सतत कारवाया सुरू आहेत. आम्हीही त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार आहोत. ज्यांनी राष्ट्रवादीत सर्व पदे भोगली, ते आता काँग्रेसच्या छत्राखाली जाऊन काहीतरी करण्याची धडपड करीत आहे. ज्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, ते आता शेतकरी संघर्ष समिती निर्माण करून आंदोलन करीत आहे, अशी टीकाही बाजोरिया यांनी केली. शेतकऱ्यांना बोंडअळीची नुकसान भरपाई जाहीर झाली, त्यासाठी राष्ट्रवादीने केलेले हल्लाबोल आंदोलनच कारणीभूत आहे, असा दावाही त्यांनी केला.शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे स्वतंत्र निवेदनशेतकºयांच्या मदतीसाठी आंदोलन करणाऱ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, शेतकरी संघर्ष समितीच्या चक्रीधरणे आंदोलनात राष्ट्रवादी सहभागी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्वतंत्रपणे जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे, अशी माहिती माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. विदर्भानंतर सध्या मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलन होणार आहे. त्यामुळे इतरांच्या बॅनरखाली आंदोलन करण्याची गरजच नाही, असे मत यावेळी आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केले.