शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

राष्ट्रवादी लढविणार यवतमाळ, आर्णी विधानसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:12 IST

राज्यात कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. पुसद हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला आहेच. शिवाय यवतमाळ व आर्णी विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार कोणत्याही परिस्थितीत दिलाच जाणार, ......

ठळक मुद्देसंदीप बाजोरिया : जिल्ह्यात काँग्रेससोबत युती नकोच, वेगळी राजकीय चूल मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. पुसद हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला आहेच. शिवाय यवतमाळ व आर्णी विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार कोणत्याही परिस्थितीत दिलाच जाणार, असे राष्टÑवादीचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे.बाजोरिया गुरुवारी येथे पत्रपरिषदेत बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना राज्यसरकारचा पाठिंबा काढणार नाही, पण भाजपचा सेनेला बाहेरचा रस्ता दाखवू शकते. फार तर याच वर्षीच्या डिसेंबरपर्यंत निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. काँग्रेससोबत आघाडी करावी का, याबाबत पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील, त्यानुसारच आम्ही वागू. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यातील स्थिती त्यांच्यापुढे नक्कीच ठेवू. काँग्रेस आम्हाला ज्या पद्धतीची वागणूक देत आहे, ते पाहाता किती दिवस आपण काँग्रेसला ‘सपोर्ट’ म्हणूनच काम करायचे, हा प्रश्नही विचारणार आहोत. वरिष्ठांनी आघाडी केलीच तर आर्णी, यवतमाळ, पुसद या तीन जागा मिळाल्याच पाहिजे, हा आमचा आग्रह राहील. आर्णीमध्ये डॉ. आरती फुपाटे यांच्या रूपाने आमच्याकडे उच्चशिक्षित उमेदवारही आहे. त्यामुळे अधिकृत असो किंवा अनधिकृत असो, आम्ही आर्णी आणि यवतमाळ या दोन जागा तर लढवणारच आहोत. पुसदचा प्रश्नच नाही. पण आर्णी आणि यवतमाळमध्ये मी स्वत: उमेदवार देईन आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदही लावेल, असे माजी आमदार बाजोरिया यांनी सांगितले.आघाडी झाल्यावर दरवेळी काँग्रेस आमच्या जागा घेते. ज्या वणीत सतत भाजपा निवडून येत आहे, तेथेही काँग्रेसच दावा करते. पण यावेळी आम्ही तसे होऊ देणार नाही. काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात सतत कारवाया सुरू आहेत. आम्हीही त्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार आहोत. ज्यांनी राष्ट्रवादीत सर्व पदे भोगली, ते आता काँग्रेसच्या छत्राखाली जाऊन काहीतरी करण्याची धडपड करीत आहे. ज्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, ते आता शेतकरी संघर्ष समिती निर्माण करून आंदोलन करीत आहे, अशी टीकाही बाजोरिया यांनी केली. शेतकऱ्यांना बोंडअळीची नुकसान भरपाई जाहीर झाली, त्यासाठी राष्ट्रवादीने केलेले हल्लाबोल आंदोलनच कारणीभूत आहे, असा दावाही त्यांनी केला.शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे स्वतंत्र निवेदनशेतकºयांच्या मदतीसाठी आंदोलन करणाऱ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, शेतकरी संघर्ष समितीच्या चक्रीधरणे आंदोलनात राष्ट्रवादी सहभागी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्वतंत्रपणे जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे, अशी माहिती माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. विदर्भानंतर सध्या मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलन होणार आहे. त्यामुळे इतरांच्या बॅनरखाली आंदोलन करण्याची गरजच नाही, असे मत यावेळी आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केले.