शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘सायबर सेफ वुमेन’वर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

सोशल मीडियावर आपण जे काही व्यक्त होतो किंवा अपलोड करतो सर्वच योग्य आहे, असा भ्रम लोकांमध्ये आहे. युवकांमध्ये मोबाईल व दुचाकीचे प्रचंड आकर्षण आहे. या दोन्ही गोष्टी त्यांनी जपूनच वापराव्यात. या वस्तू जेवढ्याच उपयोगी तेवढ्याच घातकसुद्धा आहे. सेल्फी काढण्याकडे नागरिकांचा कल दिसतो. त्यामुळे मोबाईलचा फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सेलपर्यंत आहे.

ठळक मुद्देएसपींचे मार्गदर्शन : सोशल मीडिया वापरताना जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा माहिती कार्यालय व पोलीस विभागाने संयुक्तरित्या ‘सायबर सेफ वुमेन’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात युवक-युवतींमध्ये सोशल मीडियाचे प्रचंड आकर्षण आहे. या माध्यमातून प्रत्येकजण अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. हा आपला अधिकार असला तरी एखाद्या पोस्टमुळे समाज स्वास्थ्याला धोका निर्माण होतो. या जबाबदारीचे भान ठेऊनच सोशल मीडियाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेत ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, अनिल किनगे, मार्गदर्शक रम्या कन्नन, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने आदी उपस्थित होते. सोशल मीडियावर आपण जे काही व्यक्त होतो किंवा अपलोड करतो सर्वच योग्य आहे, असा भ्रम लोकांमध्ये आहे. युवकांमध्ये मोबाईल व दुचाकीचे प्रचंड आकर्षण आहे. या दोन्ही गोष्टी त्यांनी जपूनच वापराव्यात. या वस्तू जेवढ्याच उपयोगी तेवढ्याच घातकसुद्धा आहे. सेल्फी काढण्याकडे नागरिकांचा कल दिसतो. त्यामुळे मोबाईलचा फ्रंट कॅमेरा २५ मेगापिक्सेलपर्यंत आहे. यावरून नागरिकांच्या आवडीनिवडी, चेहऱ्यावरचे हावभाव कंपन्यांच्या लक्षात येतात. याचाच फायदा घेऊन मार्केटिंग केले जाते. समाजकंटक अशा माध्यमातून गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आले आहे.यावेळी सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सायली देवस्थळे, रेखा गुरव, प्रिया उमरे, स्वाती राठोड आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बहुतांश जणांना सोशल मीडियाचे व्यसनयावेळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या पत्नी रम्या कन्नन यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, १५ वर्षांपूर्वी शाळा, महाविद्यालयात व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन व्हायचे. आज तंत्रज्ञानाचे विशेष करून सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून नागरिकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. आपली मानसिकता मोबाईलसोबत जुळली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम