शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

महिलाच जग बदलवू शकते

By admin | Updated: October 25, 2016 02:38 IST

महिलेने मनावर घेतले तर कोणतेही काम अशक्य नाही. जग बदलविण्याची क्षमता महिलेतच आहे, हे मी

स्मिताताई कोल्हे : सखी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा यवतमाळ : महिलेने मनावर घेतले तर कोणतेही काम अशक्य नाही. जग बदलविण्याची क्षमता महिलेतच आहे, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. मेळघाटसारख्या आदिवासी भागात काम करताना अनंत अडचणींचा डोंगर पार केला. त्यांच्यातीलच एक होवून काम केले, असे प्रतिपादन प्रख्यात समाजसेविका डॉ.स्मिताताई कोल्हे यांनी येथे केले. लोकमत सखी मंचच्यावतीने येथील दर्डा मातोश्री सभागृहात रविवारी आयोजित ‘लोकमत सखी सन्मान’ सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. मंचावर अमरावतीच्या समाजसेविका रजिया सुलताना, लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा आणि आर्णी येथील डॉ.कुमुदिनी नाफडे उपस्थित होत्या. डॉ.स्मिताताई कोल्हे यांनी मेळघाटातील आपला जीवनपटच उपस्थितांपुढे उलगडून दाखविला. गत ३३ वर्षांपासून आदिवासींमध्ये मिसळून नव्हेतर त्यांच्यासारखेच राहून त्या डोंगरदऱ्यात रुग्णसेवा करीत आहे. त्या म्हणाल्या, डॉ.रवींद्र कोल्हे यांनी लग्नासाठी चार अटी घातल्या होत्या. ४०० रुपयात घरसंसार चालविणे, ४० किलोमीटर पायी चालणे, पाच रुपयात लग्न आणि इतरांसाठी भिक मागण्याची तयारी अशा त्या अटी होत्या. या सगळ्या अटींचा मी विचार केला आणि रवींद्र कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मेळघाटात दाखल झाले आणि आज मी मेळघाटची झाले. मेळघाटात डॉक्टर म्हणजे पुरुष, असे समीकरण होते. मला कुणीही डॉक्टर म्हणून स्वीकारत नव्हते. महिला म्हणजे नर्सच असा त्यांचा समज होता. परंतु हरिरामवर वाघाने केलेला हल्ला आणि त्याच्यावर मी घातलेल्या ४०० ते ४५० टाक्यांनी मला मेळघाटात आदिवासींनी डॉक्टर म्हणून स्वीकारले. ज्या हरिरामवर मी टाके घातले तो माणूस आजही जिवंत आहे. मेळघाटचे वैभव सांगताना त्या म्हणाल्या, आमच्याकडे स्त्री भ्रूणहत्त्या हा प्रकारच नाही. सहा-सहा मुलानंतर मुलगी होईलच, अशी प्रतीक्षा करणारा येथील समाज आहे. आदिवासी स्त्री ही निर्भय असून हातात विळा घेवून ती कुठेही जावू शकते. स्वत:चे लग्न स्वत: ठरवते. आदिवासींची स्त्रीप्रधान संस्कृती असून येथे वृद्धाश्रमाला थारा नाही. वृद्ध माणसंही येथील झोपड्यांचा आधार असतात. मेळघाटच्या सेवेत ‘लोकमत’चा मोठा हातभार आहे. ‘लोकमत’ने आम्हाला वेळोवेळी मदत केली. नुकतेच ‘लोकमत’ने १५ लाख दिले असून त्यातून बैरागड येथे आॅपरेशन थिएटर बांधल्याचे सांगितले. सखी मंचने ग्रामीण महिलांना स्टेज दिला. ग्रामीण भागातूनच माणूस घडविला जातो, असे सांगत मुलांना यंत्र बनवू नका, त्यांना माणूस बनवा. मुलांना जगाचे दर्शन घडू द्या, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.