शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पीक विम्याचे कोट्यवधी रूपये गेले कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:26 IST

सन २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला. मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. यामुळे जिल्हा बँकेने विमा कंपनीला पत्र पाठवून एकूण पात्र शेतकरी आणि त्यांची रक्कम किती आहे याची विचारणा केली आहे. प्रत्यक्षात कंपनीकडून कुठलेही उत्तर जिल्हा बँकेला मिळाले नाही. यामुळे शेतकºयांच्या शेकडो प्रश्नांची उत्तरे देताना बँकेच्या नाकीनऊ आले आहे.

ठळक मुद्देहजारो शेतकरी वैतागले : जिल्हा बँकेचे पीक विमा कंपनीला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सन २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला. मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. यामुळे जिल्हा बँकेने विमा कंपनीला पत्र पाठवून एकूण पात्र शेतकरी आणि त्यांची रक्कम किती आहे याची विचारणा केली आहे. प्रत्यक्षात कंपनीकडून कुठलेही उत्तर जिल्हा बँकेला मिळाले नाही. यामुळे शेतकºयांच्या शेकडो प्रश्नांची उत्तरे देताना बँकेच्या नाकीनऊ आले आहे.गतवर्षी जिल्हा बँकेच्या ८० हजार शेतकरी सभासदांनी १७ कोटी ६८ लाख रुपयांचा विमा उतरविला होता. ही रक्कम इफ्को टोकिओ कंपनीकडे वर्ग करण्यात आली होती. यासोबतच केंद्र आणि राज्याचा हिस्साही विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आला. आता कंपनीने विम्याची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा केली आहे.प्रत्यक्षात कुठल्या पिकाला किती रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली, किती शेतकरी पात्र ठरले याची कुठलीही माहिती बँकेला दिली नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यातही ही रक्कम जमा झाली नाही. यामुळे शेतकरी आता बँकांना पीक विम्याची रक्कम का आली नाही म्हणून जाब विचारत आहे. या प्रश्नांचे उत्तर देताना बँकेच्या शाखेवर प्रचंड ताण येत आहे. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विमा उतरविणाºया कंपनीला किती लोकांचा विमा मंजूर झाला, त्याची रक्कम किती याची माहिती विचारली आहे. मात्र ही माहिती अद्यापही कंपनीने बँकेला कळविली नाही. यातून बँकेपुढे मोठ्या अडचणी आहे.१३ हजार प्रकरणात दुरुस्त्या करून पाठविल्यापीक विमा कंपनीने आतापर्यंत १३ हजार नावे दुरुस्त करून मागितले. यामध्ये खाते नंबर चुकणे, आधार नंबर नसणे, गावाचे नाव व मंडळ यातील तफावत अशा बाबींचा यामध्ये समावेश होता. या प्रकरणात सहा कोटी रुपयांचा विमा मंजूर केलेला आहे. ही माहिती दुरुस्त करून बँकेने विमा कंपनीला पाठविली. प्रत्यक्षात यातील तीन हजार शेतकऱ्यांनाच विमा रक्कम वळती झाली आहे. अजूनही इतर शेतकºयांची रक्कम मिळाली नाही. हा संपूर्ण प्रकार बँकेसाठी प्रचंड तापदायक झाला आहे.पेरणी तोंडावर, विम्याचा पत्ता नाहीगतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पेरणीपूर्वी ही रक्कम मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली नाही. यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी तोंडघशी पडला आहे. आपल्या मंडळाला विमा मंजूर झाला किंवा नाही याची माहितीही बँक स्तरावर कुणाकडूनही मिळत नाही.