शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

पीक विम्याचे कोट्यवधी रूपये गेले कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:26 IST

सन २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला. मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. यामुळे जिल्हा बँकेने विमा कंपनीला पत्र पाठवून एकूण पात्र शेतकरी आणि त्यांची रक्कम किती आहे याची विचारणा केली आहे. प्रत्यक्षात कंपनीकडून कुठलेही उत्तर जिल्हा बँकेला मिळाले नाही. यामुळे शेतकºयांच्या शेकडो प्रश्नांची उत्तरे देताना बँकेच्या नाकीनऊ आले आहे.

ठळक मुद्देहजारो शेतकरी वैतागले : जिल्हा बँकेचे पीक विमा कंपनीला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सन २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला. मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. यामुळे जिल्हा बँकेने विमा कंपनीला पत्र पाठवून एकूण पात्र शेतकरी आणि त्यांची रक्कम किती आहे याची विचारणा केली आहे. प्रत्यक्षात कंपनीकडून कुठलेही उत्तर जिल्हा बँकेला मिळाले नाही. यामुळे शेतकºयांच्या शेकडो प्रश्नांची उत्तरे देताना बँकेच्या नाकीनऊ आले आहे.गतवर्षी जिल्हा बँकेच्या ८० हजार शेतकरी सभासदांनी १७ कोटी ६८ लाख रुपयांचा विमा उतरविला होता. ही रक्कम इफ्को टोकिओ कंपनीकडे वर्ग करण्यात आली होती. यासोबतच केंद्र आणि राज्याचा हिस्साही विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आला. आता कंपनीने विम्याची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा केली आहे.प्रत्यक्षात कुठल्या पिकाला किती रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली, किती शेतकरी पात्र ठरले याची कुठलीही माहिती बँकेला दिली नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यातही ही रक्कम जमा झाली नाही. यामुळे शेतकरी आता बँकांना पीक विम्याची रक्कम का आली नाही म्हणून जाब विचारत आहे. या प्रश्नांचे उत्तर देताना बँकेच्या शाखेवर प्रचंड ताण येत आहे. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विमा उतरविणाºया कंपनीला किती लोकांचा विमा मंजूर झाला, त्याची रक्कम किती याची माहिती विचारली आहे. मात्र ही माहिती अद्यापही कंपनीने बँकेला कळविली नाही. यातून बँकेपुढे मोठ्या अडचणी आहे.१३ हजार प्रकरणात दुरुस्त्या करून पाठविल्यापीक विमा कंपनीने आतापर्यंत १३ हजार नावे दुरुस्त करून मागितले. यामध्ये खाते नंबर चुकणे, आधार नंबर नसणे, गावाचे नाव व मंडळ यातील तफावत अशा बाबींचा यामध्ये समावेश होता. या प्रकरणात सहा कोटी रुपयांचा विमा मंजूर केलेला आहे. ही माहिती दुरुस्त करून बँकेने विमा कंपनीला पाठविली. प्रत्यक्षात यातील तीन हजार शेतकऱ्यांनाच विमा रक्कम वळती झाली आहे. अजूनही इतर शेतकºयांची रक्कम मिळाली नाही. हा संपूर्ण प्रकार बँकेसाठी प्रचंड तापदायक झाला आहे.पेरणी तोंडावर, विम्याचा पत्ता नाहीगतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पेरणीपूर्वी ही रक्कम मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली नाही. यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी तोंडघशी पडला आहे. आपल्या मंडळाला विमा मंजूर झाला किंवा नाही याची माहितीही बँक स्तरावर कुणाकडूनही मिळत नाही.