शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘एसटी’च्या कारभाराचा लग्न वरातीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:35 IST

पहाटे ५ वाजता बस येणार म्हणून पटापट आंघोळी उरकून, तयारी करून वऱ्हाडी मंडळी तयार झाली. सर्वांच्या नजरा रस्त्याकडे लागून होत्या. एकदाची बस नजरेत पडली. जागा पकडण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पहाटे ५ वाजता बस येणार म्हणून पटापट आंघोळी उरकून, तयारी करून वऱ्हाडी मंडळी तयार झाली. सर्वांच्या नजरा रस्त्याकडे लागून होत्या. एकदाची बस नजरेत पडली. जागा पकडण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू झाली. गावात बस पोहोचल्याची वर्दी चालकाने लग्नघरी दिली. तोपर्यंत वऱ्हाड्यांनी जागा पकडून घेतली. तरीही अनेक प्रवासी शिल्लक होते. अखेर उलगडा झाला. पण सोपस्कार पूर्ण होईपर्यंत दोन तास निघून गेले.त्याचे असे झाले, सावर (ता.बाभूळगाव) येथील एका कुटुंबाने नागपूर येथे ९ मे रोजीच्या लग्न सोहळ्यासाठी दोन बसेसची नोंदणी केली होती. यासाठी आवश्यक तेवढ्या रकमेचा भरणा करण्यात आला. दोन बसच्या हिशेबाने सबंधितांना निरोप दिला. पण सकाळी एकच बस पोहोचली. विचारणा झाली तेव्हा एकच बस पाठविल्याचे सांगितले गेले. तेथून चौकशी सुरू झाली. बस बुकींगची नोंद घेणाऱ्या कर्मचाऱ्याने घातलेला घोळ पुढे आला. त्याने एकच बस बुकींगची नोंद घेतली होती.एनवेळी दुसरी बस पाठविण्याचा प्रयत्नात सावरमध्येच दोन तास निघून गेले. काही प्रवासी पुढे गेले तर काही उशिराने पोहोचले. एसटी कर्मचाऱ्याच्या दिरंगाईमुळे लग्नघरची मंडळी आणि वऱ्हाड्यांना त्रास सहन करावा लागला. प्रासंगिक करारासाठी घेतलेली बस निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने पोहोचल्यास खोळंबा भत्ता वसूल केला जातो. आता महामंडळानेच बस दोन तास उशिराने पाठविली. अशावेळी काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ