शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वणी तालुक्यावर पाणी टंचाईचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 22:37 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे.

ठळक मुद्देउपाययोजनांना वरिष्ठांकडे ब्रेक : पेटुरचा प्रश्न सुटला, नायगावला टँकरची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे. यावर स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी वरिष्ठ पातळीवर मात्र या उपाययोजनांना ब्रेक लागल्याचे दिसत आहे.वणी तालुक्यातील नायगाव (खु.) येथे पिण्यासाठी जलस्त्रोत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे या गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा व्हावा, यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु तो अद्यापही तेथे धूळ खात पडून आहे. नायगाव (खु.) ची लोकसंख्या एक हजार १२५ आहे. या गावात पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावकऱ्यांना टँकरची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील पेटूर येथे मागील वर्षापर्यंत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. परंतु गावकºयांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर या गावाला मानकी येथील बोअरवेलवरून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. यावर्षी या गावाची चिंता मिटली आहे. तालुक्यातील गोपालपूर, वरझडी, वरझडी बंडा, वडगाव (टीप), खांदला, कुर्ली या गावांमध्ये बोअर अधिग्रहण करून गावकºयांना पाणी पुरविले जात आहे.संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ उमरी येथे बोअर अधिग्रहणाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांनी मंजूर केला असला तरी अद्याप अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. निंबाळा (बु.) या गावाला पाणी पुरवठा करणाºया बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव आराखड्यात मंजूर करण्यात आला. परंतु आराखडा अद्यापही अप्राप्त आहे. वणी तालुक्यातील सावंगी या गावातही पाणी पेटले आहे. या गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा प्रस्तावित आहे. पिंपरी (कायर), तेजापूर येथेही तिच परिस्थिती आहे.पाण्याअभावी जनावरांचेही होणार हालजंगलातील तलाव, नाले व अन्य जलस्त्रोत आतापासूनच कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी आतापासूनच जनावरांचे हाल सुरू झाले आहे. वणी, मारेगाव व झरी या तीन तालुक्यात घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यजिवांची संख्याही मोठी आहे. मात्र पाण्याअभावी या वन्यजिवांचेही हाल होणार आहे. पाळीव जनावरे चरण्यासाठी जंगलात जातात. परंतु त्यांना त्याठिकाणी पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र परिसरातील जंगलांमध्ये पाहावयाला मिळत आहे. यंदा माणसांसोबत जनावरांचेदेखिल पाण्यासाठी हाल होणार आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई