शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

शेतकऱ्यांच्या परिश्रमावर निसर्गाने फेरले पाणी

By admin | Updated: October 13, 2014 23:28 IST

मागील १० वर्षात जिल्ह्याने आठवेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. यामध्ये यावर्षीचा निसर्ग प्रकोपाने पुन्हा भर घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरल्या गेले आहे.

यवतमाळ : मागील १० वर्षात जिल्ह्याने आठवेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. यामध्ये यावर्षीचा निसर्ग प्रकोपाने पुन्हा भर घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरल्या गेले आहे. मोठ्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना प्रकोपामुळे दिवाळी अंधारात साजरी करावी लागणार आहे. एकीकडे निवडणुकीने वातावरणात दिवाळीचा जल्लोष आत्तापासूनच सुरू झाला असताना शेतकऱ्यांच्या कुटुंबात मात्र अंधकार पसरला आहे. यातून शेतकरी काळजीत सापडला आहे. आपले गाऱ्हाणे कुणाकडे मांडायचे आणि आपल्या मदतीला कोण धावणार, असा पेचही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारा कापूस दसऱ्यानंतर बाजारात येतो. यावर्षी पेरण्या लांबल्याने कपाशीचे पिकही लांबले आहे. अशातच विविध रोगांचे आक्रमण पिकांवर झाल्याने पहिल्याच वेचात कपाशी उलंगवाडीवर येईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे सोयाबीनही उन्हाच्या पाऱ्याने अपरिपक्व अवस्थेत करपले आहे. दोनही मुख्य नगदी पिकेच निसर्गाने हिरावून घेतल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा गंभीर पेच शेतकरी कुटुंबापुढे निर्माण झाला आहे. दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी घरात कुठलेही धान्य शिल्लक राहिले नाही.निवडणुकीच्या झगमगाटात शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणाकडेही वेळ नाही. सर्व अधिकारी, कर्मचारीसुद्धा निवडणूक प्रक्रियेत कार्यरत आहेत. शासनाच्या कोणत्याही कार्यालयात सध्या शेतकरी व सर्वसामन्यांचे कोणतेही कामे होताना दिसत नाही. मग उत्तम परिस्थिती कशी महसूल प्रशासनाने नजर आणेवारीचा अहवाल नुकताच सादर केला. जिल्ह्याची आणेवारी सरासरी ५७ टक्के दर्शविण्यात आली. याचा अर्थ पीक परिस्थिती उत्तम असल्याचा होतो. महसूली भाषेत ५० टक्क्यांच्या वर आणेवारी असल्यास स्थिती चांगली मानली जाते. प्रत्यक्षात शेतशिवार ओस पडताहेत अशा स्थितीत महसूल प्रशासनाने उत्तम परिस्थितीचा अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचेच काम केले असल्याचे दिसून येत अहे. यातून ग्रामीण भागामध्ये संतापाची लाट पसरली आहे. (शहर वार्ताहर)