शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

शेतकऱ्यांच्या परिश्रमावर निसर्गाने फेरले पाणी

By admin | Updated: October 13, 2014 23:28 IST

मागील १० वर्षात जिल्ह्याने आठवेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. यामध्ये यावर्षीचा निसर्ग प्रकोपाने पुन्हा भर घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरल्या गेले आहे.

यवतमाळ : मागील १० वर्षात जिल्ह्याने आठवेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. यामध्ये यावर्षीचा निसर्ग प्रकोपाने पुन्हा भर घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फेरल्या गेले आहे. मोठ्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना प्रकोपामुळे दिवाळी अंधारात साजरी करावी लागणार आहे. एकीकडे निवडणुकीने वातावरणात दिवाळीचा जल्लोष आत्तापासूनच सुरू झाला असताना शेतकऱ्यांच्या कुटुंबात मात्र अंधकार पसरला आहे. यातून शेतकरी काळजीत सापडला आहे. आपले गाऱ्हाणे कुणाकडे मांडायचे आणि आपल्या मदतीला कोण धावणार, असा पेचही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारा कापूस दसऱ्यानंतर बाजारात येतो. यावर्षी पेरण्या लांबल्याने कपाशीचे पिकही लांबले आहे. अशातच विविध रोगांचे आक्रमण पिकांवर झाल्याने पहिल्याच वेचात कपाशी उलंगवाडीवर येईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे सोयाबीनही उन्हाच्या पाऱ्याने अपरिपक्व अवस्थेत करपले आहे. दोनही मुख्य नगदी पिकेच निसर्गाने हिरावून घेतल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा गंभीर पेच शेतकरी कुटुंबापुढे निर्माण झाला आहे. दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी घरात कुठलेही धान्य शिल्लक राहिले नाही.निवडणुकीच्या झगमगाटात शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणाकडेही वेळ नाही. सर्व अधिकारी, कर्मचारीसुद्धा निवडणूक प्रक्रियेत कार्यरत आहेत. शासनाच्या कोणत्याही कार्यालयात सध्या शेतकरी व सर्वसामन्यांचे कोणतेही कामे होताना दिसत नाही. मग उत्तम परिस्थिती कशी महसूल प्रशासनाने नजर आणेवारीचा अहवाल नुकताच सादर केला. जिल्ह्याची आणेवारी सरासरी ५७ टक्के दर्शविण्यात आली. याचा अर्थ पीक परिस्थिती उत्तम असल्याचा होतो. महसूली भाषेत ५० टक्क्यांच्या वर आणेवारी असल्यास स्थिती चांगली मानली जाते. प्रत्यक्षात शेतशिवार ओस पडताहेत अशा स्थितीत महसूल प्रशासनाने उत्तम परिस्थितीचा अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचेच काम केले असल्याचे दिसून येत अहे. यातून ग्रामीण भागामध्ये संतापाची लाट पसरली आहे. (शहर वार्ताहर)