शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

वावरात मजुरी, घरात गरिबी, अंगात आजार तरी 'तिच्या' गळ्यात गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:20 AM

‘अजनबी कौन हो तुम जबसे तुम्हे देखा हैं..’ तुम्हाला वाटते एखादी लब्ध प्रतिष्ठित घरातली तरुणी गात असावी. तुम्ही वळून बघता अन् कळते ही तर सत्तर वर्षांची आजी गातेय!

ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यातील हरफनमौलासत्तरीच्या संघर्षात मुरलेला सदाबहार स्वर

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘कोई लडका है जब वो गाता हैं... सावन आता हैं छनक छनक छुमछुम..’ हे या गाण्यावर नाचत असते माधुरी दीक्षित. भाबड्या रसिकांना वाटते ही अल्लड तरुणीच गातेय. पण प्रत्यक्षात स्वर असतात ९० वर्षांच्या लता मंगेशकरांचे. अगदी तशीची अवस्था होते हरसूल नावाच्या छोट्याशा खेड्यात पाहोचल्यावर. तुमच्या कानी सूर धडक देतात, ‘अजनबी कौन हो तुम जबसे तुम्हे देखा हैं..’ तुम्हाला वाटते एखादी लब्ध प्रतिष्ठित घरातली तरुणी गात असावी. तुम्ही वळून बघता अन् कळते ही तर सत्तर वर्षांची आजी गातेय! ती कधीही शाळेत न गेलेली, दररोज वावरात काबाडकष्ट उपसून रात्री स्वत:च चूल पेटविणारी... ही अवस्था ऐकल्यावर तर तुम्ही तिच्या आवाजाचे चाहते नव्हे भक्त बनता.खेड्यातल्या रोजमजुरी करणाऱ्या बाया जशा दिसतात, तशीच जिजाबाईदेखील थकलेल्या, रापलेल्या चेहºयाने भणंग जीवनाची हिस्सेदार. तिचीही जिंदगी कफल्लक. पण गळा जिंदादिल. काया सत्तरीच्या पलिकडे पोहोचलेली, पण कंठ आजही सोळाव्या वर्षात. ‘जिंदगी प्यार का गीत है’पासून तर ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही’पर्यंत सारीच गाणी ती अशा काही वकुबाने गाते, की सारे गाव तिला आपुलकीने लता मंगेशकर म्हणते!जीजाबाई भगत हे या गायिकेचे नाव. हरसुल (ता. दिग्रस) हे गाव म्हणजे तिची दुनिया अन् छोटीशी झोपडी हाच तिचा महाल. खेड्यातल्या महिलांनी आरत्या, व्रत-वैकल्याच्या निमित्ताने गायनकला जोपासलेलीच असते. पण ती भक्ती फक्त देवाची असते. त्यात गाणे नसते. जीजाबाईसाठी मात्र स्वर हाच देव असतो. अन् गाणे हीच पूजा असते. तिच्या नावामागे कोणत्याच सांगितिक घराण्याचे बिरुद नाही. शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा चौकटीतही तिचे गाणे अडकत नाही. गावातल्या अरुणावती नदीच्या प्रवाहासारखीच तिचे स्वर मुक्त वाहतात. प्रत्येकाला तृप्त करतात.बालपणापासून सुरांची साधना करता-करता अन् घरातल्या गरिबीशी लढता-लढता तिने लग्नच केले नाही. आज वृद्धत्वाचे आजार भोगतानाही ती एकटीच असते. छोटेसे घर. वृद्धत्वाने जर्जर झालेला भाऊ, मजुरी करणारा भाचा एवढाच तिचा गोतावळा. ती स्वत: दररोज सकाळीच वावरात जाते. शनिवारीही ती सकाळी १० वाजताच शिवारात निघून गेली. पण जातानाही तिच्या ओठी गाणेच होते.. आदमी मुसाफीर हैं आता हैं जाता हैं..!

स्वातंत्र्यदिनाची सेलिब्रिटी!जीजाबाईने कुठेही संगीताचे शास्त्रोक्त धडे गिरविले नाही. कधी शाळेत जाऊन अबकड शिकली नाही. पण गेल्या ५०-६० वर्षातील हिंदी सिनेगीतं तिला मुखोद्गत आहेत. हरसुलसारख्या गावात गाण्याचा ‘परफॉर्मन्स’ देण्याची एकमेव संधी म्हणजे, जिल्हा परिषद शाळेत होणारा १५ ऑगस्ट, २६ जानेवारीचा कार्यक्रम. दरवर्षी जीजाबाईला या कार्यक्रमात खास निमंत्रण असते. अन् तेथे गेल्यावर खास फर्माईश असते ती ‘ऐ मेरे वतन के लोगो’ची. लतादिदींच्या ताकदीने ती गाते अन् साऱ्यांच्या डोळ्यात अश्रूही आणते.

टॅग्स :musicसंगीत