शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आठ हजार हेक्टरला अवकाळीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

यवतमाळ शहरासह सात तालुक्यात मंगळवारी सायंकाळी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा फटका बाभूळगाव, नेर, कळंब, दिग्रस, पुसद, मारेगाव आणि राळेगाव या तालुक्यांना सोसावा लागला. एकट्या बाभूळगाव तालुक्यातील सहा हजार ९८ हेक्टर क्षेत्राचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर नेर तालुक्यातील १४७ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मंगळवारी जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. गारपिटीसह झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल आठ हजार १४९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळीची सात तालुक्यांना झळ बसली असून सर्वाधिक नुकसान बाभूळगाव तालुक्याचे झाले आहे. यवतमाळ शहरासह सात तालुक्यात मंगळवारी सायंकाळी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा फटका बाभूळगाव, नेर, कळंब, दिग्रस, पुसद, मारेगाव आणि राळेगाव या तालुक्यांना सोसावा लागला. एकट्या बाभूळगाव तालुक्यातील सहा हजार ९८ हेक्टर क्षेत्राचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर नेर तालुक्यातील १४७ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. कळंब तालुक्यातील ७००, तर दिग्रस तालुक्यातील ६४७ हेक्टर क्षेत्राला या पावसामुळे झळ बसली आहे. पुसद तालुक्यातील १५९, मारेगाव तालुक्यातील पाच हेक्टर, तर राळेगाव तालुक्यातील ३९४ हेक्टर क्षेत्राचेही पावसाने नुकसान केले. या पावसाचा गहू, हरभरा, भाजीपाला, कापूस, तुरीसह फळ पिकांना मोठा फटका सोसावा लागला. अवकाळीमुळे कळंब तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले तर पुसद तालुक्यातील २१ आणि राळेगाव तालुक्यातील २१७ हेक्टर क्षेत्रही बाधित झाले. दिग्रस तालुक्यातील १७७ हेक्टर क्षेत्रावरील, तर बाभूळगाव तालुक्यातील १२ हेक्टर क्षेत्रावरील फळ पिकांनाही अवकाळी पावसाची झळ बसली आहे.दरम्यान, सरत्या वर्षात शेतकऱ्यांना सुरुवातीला अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यानंतरही नुकसानीचे शुक्लकाष्ठ सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. तर लोकप्रतिनिधींनीही तातडीने नुकसान पाहणी दाैऱ्यास सुरुवात केली आहे. आमदार अशोक उईके यांनी बुधवारी तातडीने बाभूळगाव तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गारपिटीने तुरीच्या शेंगा फोडल्यादाभा (पहूर) : बाभूळगाव तालुक्याच्या दाभा (पहूर) परिसराला मंगळवारी गारपीट झाली. बोरापेक्षाही मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने झाडाला असलेल्या तुरीच्या वाळलेल्या शेंगा फुटल्या. तुरीचा सडा शेतात पडून होता. या प्रकारात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हरभऱ्यासह भाजीपाला पिकालाही तडाखा बसला. शेतातून घरी परतणाऱ्या मजुरांचे हाल झाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने तारा तुटल्या. त्यामुळे अनेक गावे अंधारात होती.

जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान तुरीचे- जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन घेतलेले आहे. सध्या हे पीक काढणीच्या स्थितीत आहे. तर साधारण ८० हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा आहे. या दोन प्रमुख पिकांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा सोसावा लागला आहे. - बाभूळगाव तालुक्यातील तब्बल तीन हजार ५१९ हेक्टर क्षेत्रावरील तुरीचे नुकसान झाले आहे. नेर ४७, दिग्रस ४४०, कळंब २७५, पुसद आठ, मारेगाव चार, तर राळेगाव तालुक्यातील १७७ हेक्टर क्षेत्रावरील तुरीला पावसाचा फटका बसला. 

गहू आडवा, हरभऱ्याचे घाटे गळाले- जिल्ह्यात ६४१ हेक्टर क्षेत्रावरील गव्हाचे उभे पीक आडवे झाले आहे. तर, २४३४ हेक्टर क्षेत्रावरील हरभऱ्याचे नुकसान झाले असून, घाटे गळाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. गव्हाचे सर्वाधिक ४३५ हेक्टरवरील नुकसान बाभूळगाव तालुक्यात झाले आहे. - कळंब १०० आणि पुसद तालुक्यातील १०५ हेक्टरवरील गव्हालाही या अवकाळीचा फटका बसला. बाभूळगाव तालुक्यातील २११२ हेक्टर हरभऱ्याला पावसाचा दणका बसला असून नेर १००, कळंब २००, तर पुसद तालुक्यातील २५ हेक्टर हरभऱ्याचे पीक बाधित झाल्याचा अंदाज आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती