शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

खरिपातील नुकसान भरून काढता यावे, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची लागवड केली. या स्थितीत कॅनॉल क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. हे वेळापत्रक लांबले. यातून रब्बीचे पीक काढणीला येण्याचा कालावधी लांबला. याच लांबलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने झडप घातली. एक वेळेस पाऊस येऊन थांबला नाही. पाच दिवस पाऊस बरसला आहे. पाच दिवसांमध्ये सरासरी १२ मिमी  पावसाची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देज्वारी, गहू काळवंडणार : भाजीपाला, हळद उत्पादकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसाने शेत शिवारात मोठे नुकसान झाले आहे. यात हळद, गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागाने आणखी दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहे. सततचे नुकसान होत असताना शेत शिवारातून नुकसानीचा अहवाल अद्यापही पुढे आला नाही. यामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळणार किंवा नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात या वर्षी खरिपाच्या पेरणीपासूनच कृषी क्षेत्रावर मोठे संकट घोंगावत आहे. खरिपातील नुकसान भरून काढता यावे, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची लागवड केली. या स्थितीत कॅनॉल क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. हे वेळापत्रक लांबले. यातून रब्बीचे पीक काढणीला येण्याचा कालावधी लांबला. याच लांबलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने झडप घातली. एक वेळेस पाऊस येऊन थांबला नाही. पाच दिवस पाऊस बरसला आहे. पाच दिवसांमध्ये सरासरी १२ मिमी  पावसाची नोंद करण्यात आली. सतत झडी स्वरूपाच्या पावसाने गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवेच्या वेगाने गहू आडवा झाला. पडलेल्या पावसाने गहू काळा पडण्याची दाट शक्यता आहे. असाच फटका रब्बीच्या ज्वारीला बसण्याचा धोका आहे. ज्वारी परिपक्व अवस्थेत आहे. त्या सुमारास पाऊस बरसल्याने ही ज्वारी काळी पडण्याचा धाेका वाढला आहे. मक्याच्या पिकाचे पावसाने नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड झाली. हळद काढणीच्या अवस्थेत आहे. शेतात हळद शिजविण्याचे काम सुरू आहे. ही हळद शेत शिवारातच वाळू घातली जाते. मधातच पाऊस बरसल्याने हळदीला डाग पडण्याची शक्यता आहे. पावसाने भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालेभाज्या सडत आहे. यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र नुकसान आले आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण अद्यापही झाले नाही.

मजूर टंचाई आणि यंत्राच्या कमतरतेने धोका  जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी यंदा गव्हाची पेरणी उशिरा केली होती. त्यामुळे अनेकांचा गहू सोंगणी अभावी शेतातच आहे. या पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. तर गहू काढणीसाठी अनेकांना मजूर मिळाले नाही. तर अनेक शेतकरी हार्वेस्टरची प्रतीक्षा करीत आहे. त्यातच अचानक आलेल्या पावसाने हाताशी आलेले पीक उद्‌ध्वस्त केले. गव्हासह हरभरा, आंबा, भाजीपाला या पिकांसह खेड्यातील घरादारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊस