शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

प्रचारातून बेरोजगारीचा प्रश्न गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:26 IST

सुपीक शेती आणि कसदार शिक्षण देणाऱ्या संस्था हे जिल्ह्याचे वैभव असले तरी या दोन्ही क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या तरुणांना सामावून घेणाºया उद्योगांची जिल्ह्यात प्रचंड वाणवा आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील बेरोजगारांचा आकडा वाढत गेला. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बेरोजगारीची समस्या कोणत्याही पक्षाच्या खिजगिणतीत दिसत नाही.

ठळक मुद्देतरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावातज्ज्ञ म्हणतात, अजून बरेच करावे लागेल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुपीक शेती आणि कसदार शिक्षण देणाऱ्या संस्था हे जिल्ह्याचे वैभव असले तरी या दोन्ही क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या तरुणांना सामावून घेणाऱ्या उद्योगांची जिल्ह्यात प्रचंड वाणवा आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील बेरोजगारांचा आकडा वाढत गेला. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बेरोजगारीची समस्या कोणत्याही पक्षाच्या खिजगिणतीत दिसत नाही.गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात नवतरुणांच्या रूपात पावणेदोन लाख नव्या मतदारांची भर पडली आहे. मात्र या तरुणांच्या हाताला काम देणारे धोरण यवतमाळ-वाशिम, चंद्रपूर किंवा हिंगोली मतदारसंघातील कोणत्याही खासदाराने राबविलेले नाही. जिल्ह्यातील खासदारांनी संसदेत बेरोजगारीच्या समस्येवर कधीही चर्चा घडवून आणली नाही.यवतमाळच्या एमआयडीसीमधील ८० टक्के भूखंड उद्योगाविना पडून आहे. मोठे उद्योग नसल्याने जिल्ह्यातील तरुणांना परजिल्ह्यात किंवा परराज्यात धाव घ्यावी लागत आहे. तालुकास्तरावरील एमआयडीसीच्या जागा केवळ फलकांनी सुशोभित झाल्या आहे. स्वयंरोजगारासाठी मुद्रा लोण देतानाही केवळ राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचेच भले करण्यात आले. पाच वर्ष बेरोजगारीवर ब्र शब्द न काढणाºया खासदारांनी निवडणुकीच्या तोंडावर यवतमाळात रोजगार मेळावा भरविला. मात्र त्यातूनही समस्या सुटलेली नाही. राजकीय वरदहस्ताने चालणाºया जिल्हा बँकेत भरतीच्या हालचाली सुरू असल्या तरी लिपिकासारख्या पदासाठीही लाखोंची बोली लावली जात आहे. विनाअनुदानित शाळेवर १५-१५ वर्षे बेरोजगार युवक फुकट राबत आहे. गंभीर म्हणजे हे सर्व मुद्दे सर्वच उमेदवारांनी नजरेआड केले.आतापर्यंत काय झाले उपाय?1जिल्ह्याच्या ठिकाणी एमआयडीसी आली. मात्र या औद्योगिक वसाहतीत रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांपेक्षा वाहनांचे सर्व्हिसिंग सेंटर, व्यावसायिकांची गोदामे एवढेच प्रकार सुरू आहे.2मुद्रा लोण योजनेतून बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी होती. मात्र जिल्ह्यातील सत्ताधारी पुढाऱ्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना किंवा आधीच कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना मुद्रा लोण मिळवून दिले.3खासदारांनी निवडणुकीच्या तोंडावर रोजगार मेळावा घेतला. मात्र त्याला केवळ राजकीय स्वरूप होते.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1जिल्ह्यातील कापसाचा पट्टा लक्षात घेता बंद पडलेल्या सूतगिरण्या पुन्हा सुरू केल्या जाव्या. त्यातून ग्रामीण तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची शक्यता आणि कापसाला भाव मिळण्याची आशा आहे.2शेती उत्पादनात अग्रेसर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजे. त्यातून शेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडण्याची शक्यता आहे.3वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे तातडीने सुरू झाल्यास जिल्ह्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होवून रोजगार वाढीला चालना मिळेल.रोजगारासाठी परजिल्ह्यात धावाधावयवतमाळ जिल्ह्यात उद्योग नसल्याने येथील बेरोजगार तरुण पुणे, मुंबई, तर अनेकजण परराज्यातही धाव घेत आहे. त्यातून खेडी बकाल झाली.20% उद्योगच यवतमाळ येथे सुरू आहेत. यवतमाळऔद्योगिक वसाहतीत उर्वरित भूखंड रिकामे आहेत.लोकप्रतिनिधींनी बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर शिबिर घेऊन रोजगाराबाबत मार्गदर्शन मिळवून द्यावे. दहावीच्या कलचाचणीतून विद्यार्थ्यांचा जो कल बाहेर आला, त्या निष्कर्षावर आधारित जिल्ह्यात उपाययोजना केल्यास सुशिक्षित तरुणांना लवकर रोजगार मिळेल.- किशोर बनारसे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य समुपदेशक संघजिल्ह्यात बेरोजगारी हा अत्यंत गंभीर विषय आहे. परंतु कोणताही नेता त्याबाबत बोलायला तयार नाही. तरुणांनी मोठ्या विश्वासाने भाजपला सत्ता दिली. परंतु पाच वर्षानंतरही बेरोजगारीचा आकडा कायम आहे. भावनिक मुद्यांवर प्रचार करताना बेरोजगारीची समस्या नजरेआड केली जात आहे.- विश्वास निकम, जिल्हाध्यक्ष, नायक फाऊंडेशन