शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

हापशीवर दोन तासानंतर दोन गुंड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:20 IST

नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यांचे.

ठळक मुद्देरात्रभर जागरण : झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यांचे. रात्रभर जागूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने आता यवतमाळकरांच्या संयमाचा बांध फुटत आहे.बेंबळाचे पाणी येणार, गोखीचे पाणी पोहोचणार अशा राजकीय वल्गनाही कोरड्या ठरल्या. शहरातील प्रत्येक भागात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. मागासवस्त्यांमध्ये तर पाण्याशिवाय दुसरा कोणताच चर्चेचा विषय नाही. पाणी कसे मिळवायचे याचीच रात्रंदिवस चिंता असते. नगरपरिषदेचे टँकर वेळेवर येत नाही, आले तरी तोंड पाहून पाणी वाटतात. काही भागात तर आठ-आठ दिवस टँकरचे दर्शनही होत नाही. नळाची तर आशाच यवतमाळकरांनी सोडली आहे. अशा परिस्थितीत परिसरात असलेले हातपंप (हापशी) एकमेव आधार ठरत आहे. परंतु या ठिकाणीही रात्रंदिवस प्रचंड गर्दी असते. पाण्याचे भांडे ठेऊन दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागते. एकदाचा नंबर लागला की प्रचंड परिश्रमाने हापसून पाणी येते. दोन गुंड भरत नाही तोच दुसरा ओरडायला सुरुवात करतो आम्हालाही पाणी मिळू द्या, असे म्हणत आपला गुंड हापशी खाली लावतो. यातून अनेकदा भानगडी होतात. पाण्यावरून वाद होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे.रोजमजुरी बुडवून अनेक जण सायकलला पिंप बांधून घरी पाणी आणत आहे. शुद्ध-अशुद्ध पाण्याचा विचार न करता पाणी मिळते ना यावरच समाधान मानावे लागत आहे. अशा भीषण परिस्थितीत आता नगरसेवकही वार्डात यायलाच काय फोनही उचलायला घाबरत आहे. नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याने त्यांचीही मोठी पंचाईत झाली आहे. पाणी आणायचे कोठून आणि वितरण करायचे कसे असा प्रश्न आहे. वस्तीत टँकर आला की पाण्यावरून वाद सुरू होतो. याचाही धसका अनेक टँकर चालकांनी घेतला आहे. काही भागात तर टँकर चालक जायलाही तयार नाही. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत असल्याने यवतमाळची ही पाणीटंचाई कोणत्या स्तराला जाईल, हे सांगता येत नाही.पाण्याच्या शोधात डोळ्यात पाणीनळाचे पाणी येण्याची कोणतीही शक्यता नाही. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने पाण्याचा शोध घेत आहे. दररोज पालिकेसह जिल्हा कचेरीवर मोर्चे धडकत आहे. परंतु आश्वासनापलीकडे काहीही होत नाही. आता यवतमाळात नळाला पाणीच नसल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निगरगट्ट यंत्रणा आजही गोखी-बेंबळाचे पाणी येणारच असे सांगत आहे. परंतु दिलेल्या तारखाही उलटत असल्याने त्यांच्या घशालाही आता कोरड पडली आहे. पाणी आणायचे कुठून हाच खरा प्रश्न आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई