शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

हापशीवर दोन तासानंतर दोन गुंड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:20 IST

नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यांचे.

ठळक मुद्देरात्रभर जागरण : झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नळ येणे बंद झाले. नगरपरिषदेचे टँकरही वेळेवर येत नाही. हापशीवर जावे तर लांबच लांब रांग. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर मिळते केवळ दोन गुंड पाणी. रात्रभर त्यासाठीही वाद-विवाद आणि भानगडी हे चित्र आहे, पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या यवतमाळ शहरातील मागासवस्त्यांचे. रात्रभर जागूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने आता यवतमाळकरांच्या संयमाचा बांध फुटत आहे.बेंबळाचे पाणी येणार, गोखीचे पाणी पोहोचणार अशा राजकीय वल्गनाही कोरड्या ठरल्या. शहरातील प्रत्येक भागात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. मागासवस्त्यांमध्ये तर पाण्याशिवाय दुसरा कोणताच चर्चेचा विषय नाही. पाणी कसे मिळवायचे याचीच रात्रंदिवस चिंता असते. नगरपरिषदेचे टँकर वेळेवर येत नाही, आले तरी तोंड पाहून पाणी वाटतात. काही भागात तर आठ-आठ दिवस टँकरचे दर्शनही होत नाही. नळाची तर आशाच यवतमाळकरांनी सोडली आहे. अशा परिस्थितीत परिसरात असलेले हातपंप (हापशी) एकमेव आधार ठरत आहे. परंतु या ठिकाणीही रात्रंदिवस प्रचंड गर्दी असते. पाण्याचे भांडे ठेऊन दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागते. एकदाचा नंबर लागला की प्रचंड परिश्रमाने हापसून पाणी येते. दोन गुंड भरत नाही तोच दुसरा ओरडायला सुरुवात करतो आम्हालाही पाणी मिळू द्या, असे म्हणत आपला गुंड हापशी खाली लावतो. यातून अनेकदा भानगडी होतात. पाण्यावरून वाद होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे.रोजमजुरी बुडवून अनेक जण सायकलला पिंप बांधून घरी पाणी आणत आहे. शुद्ध-अशुद्ध पाण्याचा विचार न करता पाणी मिळते ना यावरच समाधान मानावे लागत आहे. अशा भीषण परिस्थितीत आता नगरसेवकही वार्डात यायलाच काय फोनही उचलायला घाबरत आहे. नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याने त्यांचीही मोठी पंचाईत झाली आहे. पाणी आणायचे कोठून आणि वितरण करायचे कसे असा प्रश्न आहे. वस्तीत टँकर आला की पाण्यावरून वाद सुरू होतो. याचाही धसका अनेक टँकर चालकांनी घेतला आहे. काही भागात तर टँकर चालक जायलाही तयार नाही. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत असल्याने यवतमाळची ही पाणीटंचाई कोणत्या स्तराला जाईल, हे सांगता येत नाही.पाण्याच्या शोधात डोळ्यात पाणीनळाचे पाणी येण्याची कोणतीही शक्यता नाही. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने पाण्याचा शोध घेत आहे. दररोज पालिकेसह जिल्हा कचेरीवर मोर्चे धडकत आहे. परंतु आश्वासनापलीकडे काहीही होत नाही. आता यवतमाळात नळाला पाणीच नसल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. निगरगट्ट यंत्रणा आजही गोखी-बेंबळाचे पाणी येणारच असे सांगत आहे. परंतु दिलेल्या तारखाही उलटत असल्याने त्यांच्या घशालाही आता कोरड पडली आहे. पाणी आणायचे कुठून हाच खरा प्रश्न आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई