शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
4
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
5
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
6
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
7
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
8
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
9
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
10
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
11
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
12
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
13
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
14
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
15
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
16
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
17
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
18
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
19
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
20
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...

उत्स्फूर्त सहभागाने वृक्षसंवर्धन चळवळ तेजोमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:50 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ याप्रमाणे मानवाला वृक्षांची कितपत गरज आहे याची सर्वांना कल्पना आहे. जागोजागी जेव्हा वृक्षांची कत्तल वाढली, जंगले विरळ झाली तेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळला. यानंतर शासनाने वृक्षसंवर्धनाच्या विविध योजना अंमलात आणल्या.

ठळक मुद्देसंडे अँकर । नेरमध्ये ‘कारवा बनता गया’, पर्यावरण संवर्धन मंडळाची निर्मिती, ट्री गार्डसाठी प्रत्येकी ५०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ याप्रमाणे मानवाला वृक्षांची कितपत गरज आहे याची सर्वांना कल्पना आहे. जागोजागी जेव्हा वृक्षांची कत्तल वाढली, जंगले विरळ झाली तेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळला. यानंतर शासनाने वृक्षसंवर्धनाच्या विविध योजना अंमलात आणल्या. मात्र अनेक ठिकाणी या कागदावर राहिल्या किंवा नाममात्र ठरल्या. काही झाडे पाण्याअभावी कोमेजली. ही दशा थांबली जावी यासाठी काही वृक्षप्रेमींनी पर्यावरण संवर्धन मंडळाची निर्मिती केली. पाच-पन्नास नव्हे तर तब्बल ५०० झाडे त्यांनी जगविली. संवर्धनाची जबाबदारी या मंडळातील सर्वांनी उचलली. सुरुवातीला नेमक्या लोकांचा सहभाग या संवर्धन मंडळात होता. पुढे-पुढे वृक्षप्रेमींची संख्या यामध्ये वाढत गेली. लावलेली वृक्ष जगविण्यासाठी मंडळातील सदस्यांनी प्रत्येकी ५०० रुपये गोळा केले. यातून लोखंडी ट्री गार्ड खरेदी करून लावण्यात आले. शहरातील स्मशानभूमी परिसर, एसटी आगार, तहसील कार्यालय, न्यायालय परिसर, अमरावती रोड आदी भागात लावलेल्या या गार्डमुळे वृक्षांचे संरक्षण होत आहे. अ‍ॅड. बाबा चौधरी, राजेश चौधरी यांनी ट्री गार्डसाठी १५ हजार रुपयांची मदत केली. मंडळातील युवक दररोज भर उन्हात झाडांना पाणी देत आहेत. यामुळे वृक्षसंवर्धनाची चळवळ तेजोमय होत आहे. हीच आता प्रत्येक गावाची गरज बनली आहे.भर उन्हात ते देतात झाडाला पाणीउन्हाच्या तडाख्याने दुपारच्यावेळी कुणी सहजासहजी बाहेर पडण्यास धजावत नाही. मात्र पर्यावरण संवर्धन मंडळातील आकाश काळे, कौस्तुभ ढवळे, रामेश्वर पवार, संकेत ठाकरे, चेतन ढोरे, सागर गुल्हाने, विशाल गोंडाने, रवींद्र जीपकाटे ही मंडळी झाडे जगविण्यासाठी भर उन्हात पाणी देतात. त्यांची ही धडपड कौतुकास्पद आहे.