शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

उत्स्फूर्त सहभागाने वृक्षसंवर्धन चळवळ तेजोमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:50 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ याप्रमाणे मानवाला वृक्षांची कितपत गरज आहे याची सर्वांना कल्पना आहे. जागोजागी जेव्हा वृक्षांची कत्तल वाढली, जंगले विरळ झाली तेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळला. यानंतर शासनाने वृक्षसंवर्धनाच्या विविध योजना अंमलात आणल्या.

ठळक मुद्देसंडे अँकर । नेरमध्ये ‘कारवा बनता गया’, पर्यावरण संवर्धन मंडळाची निर्मिती, ट्री गार्डसाठी प्रत्येकी ५०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ याप्रमाणे मानवाला वृक्षांची कितपत गरज आहे याची सर्वांना कल्पना आहे. जागोजागी जेव्हा वृक्षांची कत्तल वाढली, जंगले विरळ झाली तेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळला. यानंतर शासनाने वृक्षसंवर्धनाच्या विविध योजना अंमलात आणल्या. मात्र अनेक ठिकाणी या कागदावर राहिल्या किंवा नाममात्र ठरल्या. काही झाडे पाण्याअभावी कोमेजली. ही दशा थांबली जावी यासाठी काही वृक्षप्रेमींनी पर्यावरण संवर्धन मंडळाची निर्मिती केली. पाच-पन्नास नव्हे तर तब्बल ५०० झाडे त्यांनी जगविली. संवर्धनाची जबाबदारी या मंडळातील सर्वांनी उचलली. सुरुवातीला नेमक्या लोकांचा सहभाग या संवर्धन मंडळात होता. पुढे-पुढे वृक्षप्रेमींची संख्या यामध्ये वाढत गेली. लावलेली वृक्ष जगविण्यासाठी मंडळातील सदस्यांनी प्रत्येकी ५०० रुपये गोळा केले. यातून लोखंडी ट्री गार्ड खरेदी करून लावण्यात आले. शहरातील स्मशानभूमी परिसर, एसटी आगार, तहसील कार्यालय, न्यायालय परिसर, अमरावती रोड आदी भागात लावलेल्या या गार्डमुळे वृक्षांचे संरक्षण होत आहे. अ‍ॅड. बाबा चौधरी, राजेश चौधरी यांनी ट्री गार्डसाठी १५ हजार रुपयांची मदत केली. मंडळातील युवक दररोज भर उन्हात झाडांना पाणी देत आहेत. यामुळे वृक्षसंवर्धनाची चळवळ तेजोमय होत आहे. हीच आता प्रत्येक गावाची गरज बनली आहे.भर उन्हात ते देतात झाडाला पाणीउन्हाच्या तडाख्याने दुपारच्यावेळी कुणी सहजासहजी बाहेर पडण्यास धजावत नाही. मात्र पर्यावरण संवर्धन मंडळातील आकाश काळे, कौस्तुभ ढवळे, रामेश्वर पवार, संकेत ठाकरे, चेतन ढोरे, सागर गुल्हाने, विशाल गोंडाने, रवींद्र जीपकाटे ही मंडळी झाडे जगविण्यासाठी भर उन्हात पाणी देतात. त्यांची ही धडपड कौतुकास्पद आहे.