शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

उत्स्फूर्त सहभागाने वृक्षसंवर्धन चळवळ तेजोमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:50 IST

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ याप्रमाणे मानवाला वृक्षांची कितपत गरज आहे याची सर्वांना कल्पना आहे. जागोजागी जेव्हा वृक्षांची कत्तल वाढली, जंगले विरळ झाली तेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळला. यानंतर शासनाने वृक्षसंवर्धनाच्या विविध योजना अंमलात आणल्या.

ठळक मुद्देसंडे अँकर । नेरमध्ये ‘कारवा बनता गया’, पर्यावरण संवर्धन मंडळाची निर्मिती, ट्री गार्डसाठी प्रत्येकी ५०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ याप्रमाणे मानवाला वृक्षांची कितपत गरज आहे याची सर्वांना कल्पना आहे. जागोजागी जेव्हा वृक्षांची कत्तल वाढली, जंगले विरळ झाली तेव्हा निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ढासळला. यानंतर शासनाने वृक्षसंवर्धनाच्या विविध योजना अंमलात आणल्या. मात्र अनेक ठिकाणी या कागदावर राहिल्या किंवा नाममात्र ठरल्या. काही झाडे पाण्याअभावी कोमेजली. ही दशा थांबली जावी यासाठी काही वृक्षप्रेमींनी पर्यावरण संवर्धन मंडळाची निर्मिती केली. पाच-पन्नास नव्हे तर तब्बल ५०० झाडे त्यांनी जगविली. संवर्धनाची जबाबदारी या मंडळातील सर्वांनी उचलली. सुरुवातीला नेमक्या लोकांचा सहभाग या संवर्धन मंडळात होता. पुढे-पुढे वृक्षप्रेमींची संख्या यामध्ये वाढत गेली. लावलेली वृक्ष जगविण्यासाठी मंडळातील सदस्यांनी प्रत्येकी ५०० रुपये गोळा केले. यातून लोखंडी ट्री गार्ड खरेदी करून लावण्यात आले. शहरातील स्मशानभूमी परिसर, एसटी आगार, तहसील कार्यालय, न्यायालय परिसर, अमरावती रोड आदी भागात लावलेल्या या गार्डमुळे वृक्षांचे संरक्षण होत आहे. अ‍ॅड. बाबा चौधरी, राजेश चौधरी यांनी ट्री गार्डसाठी १५ हजार रुपयांची मदत केली. मंडळातील युवक दररोज भर उन्हात झाडांना पाणी देत आहेत. यामुळे वृक्षसंवर्धनाची चळवळ तेजोमय होत आहे. हीच आता प्रत्येक गावाची गरज बनली आहे.भर उन्हात ते देतात झाडाला पाणीउन्हाच्या तडाख्याने दुपारच्यावेळी कुणी सहजासहजी बाहेर पडण्यास धजावत नाही. मात्र पर्यावरण संवर्धन मंडळातील आकाश काळे, कौस्तुभ ढवळे, रामेश्वर पवार, संकेत ठाकरे, चेतन ढोरे, सागर गुल्हाने, विशाल गोंडाने, रवींद्र जीपकाटे ही मंडळी झाडे जगविण्यासाठी भर उन्हात पाणी देतात. त्यांची ही धडपड कौतुकास्पद आहे.