शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर कापूस सुकविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. आणखीही पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. परतीचा पाऊस आणखी यायचा असल्याचे सांगितले जाते. आधीच झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना हवामान खात्याने आणखी पाऊस येण्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा परिणाम। सीसीआय, पणन, खासगी कापूस खरेदी लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जिल्ह्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके हातची गेली. सुरुवातीला पेरलेला कापूस पावसामुळे ओला झाला. हा कापूस आता सुकविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. आणखीही पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. परतीचा पाऊस आणखी यायचा असल्याचे सांगितले जाते. आधीच झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना हवामान खात्याने आणखी पाऊस येण्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे. आणखी पाऊस आल्यास हाती असलेले छुटपुट पीकही पावसात वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरमध्ये कापूस आहे. कमी जास्त प्रमाणात तेवढेच क्षेत्र सोयाबीनचे आहेत. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या हातचा सोयाबीन गेला. कपाशीवर रोगाचा प्रादूर्भाव आहे. कुठे कपाशीचे झाड वाढले, मात्र त्याला बोंडे नाहीत तर कुठे पावसामुळे बोंडे तडकल्याची स्थिती आहे. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती थोडाबहुत कापूस लागला आहे. मात्र तोही ओला झाला आहे. त्यामुळे सध्या हा कापूस वाळविण्याची मोहीम अनेक गावात पहायला मिळते.आतापर्यंत सुरू असलेला पाऊस व पुन्हा पावसाची चिन्हे असल्याने यावेळी विक्रीसाठी येणारा कापूस ओला राहू शकतो, याचा अंदाज खरेदीदारांना आला आहे. त्यामुळेच अद्यापही खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केलेली नाही. खेडा खरेदी यावेळी लांबण्याची व आॅक्टोबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शासनाकडून सीसीआय, पणन महासंघामार्फत हमी भावानुसार होणारी कापूस खरेदी सुरू होण्याची चिन्हे नाहीत. शासनालाही विक्रीसाठी ओला कापूस येण्याची भीती असावी, त्यामुळेच की काय शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ लांबणीवर टाकला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे.मृग नक्षत्रात पेरलेला कापूस आला घरातकापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे खरीप हंगामात साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील २० ते ३० हजार हेक्टर क्षेत्रात मृगनक्षत्रात सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्या शेतकऱ्यांचा कापूस वेचणी होऊन घरात आला आहे. या काळात पाऊस झाल्याने हा कापूस ओला झाला. पर्यायाने अनेक गावात घरासमोर ओला झालेला कापूस सुकविण्यासाठी उन्हात वाळू घातल्याचे हे चित्र जिल्ह्यात सर्वदूर पहायला मिळते.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस