शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 8, 2016 02:33 IST

शासनाकडून प्रत्येक वर्षी पीककर्ज वाटप मोहीम राबविली जाते. पण काही शेतकऱ्यांना कर्जच मिळत नसल्याचे समोर आले आहे.

मोहदी : शासनाकडून प्रत्येक वर्षी पीककर्ज वाटप मोहीम राबविली जाते. पण काही शेतकऱ्यांना कर्जच मिळत नसल्याचे समोर आले आहे. कमी जमीनधारक शेतकऱ्यांना अल्प पीक कर्ज लवकर मिळते. पण अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसते. परिणामी गत तीन वर्षांपासून काही शेतकरी कर्जापासून वंचित आहेत.पीक कर्जाचे पुनर्गठण केले जात आहे. पण तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना कर्जच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. या वंचित शेतकऱ्यांची संख्या ६० टक्के असल्याचेही सांगण्यात येत आहे. सतत तीन वर्षे पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी असल्यास दुष्काळी परिस्थिती जाहीर केली जाते. यामुळे सक्तीची कर्ज वसुली थांबविली जाते. पण शेतकरी सावरेल याची शाश्वती नसते. खरीप पीककर्ज वाटप सुरू आहे. पण याचा लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच होत आहे. तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहे. कमी शेती असलेल्यांच्या तुलनेत अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा खर्चही अधिक असतो. परिणामी सधन शेतकऱ्यांवर गंडांतर येत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमीन विकण्याचा सपाटा लावला. (वार्ताहर)