शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

यवतमाळ जिल्ह्यात रस्त्याची हजारो कोटींची कामे मंजूर - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 7:10 PM

रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी 1 हजार 160 कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी 1 हजार 84 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

यवतमाळ -  रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी 1 हजार 160 कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी 1 हजार 84 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यात विविध रस्त्यांचे जाळे विणले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.वणी येथे राष्ट्रीय महामार्ग 930, वरोरा-वणी सेक्शनचे चौपदरीकरण आणि पिंपळखुटी येथील अतिरिक्त दुपदरी रेल्वे ओव्हर ब्रिजचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा. डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, माजी खासदार विजय दर्डा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विभागीय व्यवस्थापक एम. चंद्रशेखर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आदी उपस्थित होते.यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात 10 हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत, असे सांगून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी म्हणाले, वणी शहरातील दोन किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शेतक-यांना सिंचनाची सोय आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. शेतीमध्ये नवनवीन संशोधनाची गरज आहे. शेतउत्पादनावर भविष्यात पेट्रोल, डिझेल, गॅस निर्माण करण्याचे नियोजन आहे. नागपूरमध्ये इथेनॉलवर चालणा-या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. पराट्या, तुराट्या, ज्वारीचे फड, सोयाबीनचे कुटार आदी बायोमासपासून सेकंड जनरेशन इथेनॉल आणि बायो सीएनजी तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.बांबूपासून शर्ट, फर्निचर, लोणचं, पेपर, प्लायवूड आणि बायो इथेनॉल तयार करता येते. त्यामुळे बांबुची लागवड करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे बांबु आता गवत या प्रकारामध्ये मोडत असल्यामुळे बांबु तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. बायोसीएनजी सारखे प्रकल्प यवतमाळ-वणी भागात सुरू करण्याचे नियोजन आहे. अमेरिकेतील कंपनीच्या सहाय्याने भद्रावतीला कोळशापासून युरिया तयार करण्याचे तंत्रज्ञान आणले आहे. वणी भागात कोळसा असल्यामुळे येथे मिथेनॉलचे उद्योग उभे राहू शकतात. राज्यातील जलसंवर्धनाबाबत गडकरी म्हणाले, सिंचनासाठी राज्याला 1 लक्ष कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यापैकी 20 हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रकल्प आहे. भविष्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ब्रिज कम बंधा-याची काम हाती घ्यावी. यवतमाळमध्ये सेंद्रीय शेतीची कामे चांगली आहे. त्यासाठी नवनवीन संशोधन समजून घेण्याची गरज आहे. शेतीवरचा खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात विविध क्षेत्रात एकूण 5 लक्ष कोटींची कामे करण्याचे उद्दिष्ट आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार सुरेश धानोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारा जिल्ह्यातील वणी येथील राष्ट्रीय महामार्ग 930 वर वरोरा ते  वणी एकूण 18.31 किमी लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा टप्पा वरोरापासून 313.850 किमी ते  332.160 किमी पर्यंतचा आहे. या महामार्गाचे कामकाज ईपीसी म्हणजेच इंजिनीअरींग खरेदी आणि बांधकाम या तत्वावर करण्यात येणार आहे. चार पदरी असणाऱ्या या महामार्गासाठी एकूण 584.58 कोटी निधी लागणार असून भुमी अधिग्रहणासाठी 312.69 कोटी असे एकूण 904.25 कोटी रुपयांची तरतुद केलेली आहे. याअंतर्गत वर्धा नदीवरील एक मोठा पुल, तीन लहान पुल, वरोरा बायपासवर एक रेल ओव्हरब्रिज, जांब ते चंद्रपुर वाहतूक अबाधित राहावी यासाठी वरोरा बायपासच्या आरंभ बिंदुजवळ एक उड्डाण पूल प्रस्तावित आहे.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र