शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-मराठवाड्यातील मुलांना शिक्षणासाठी करावा लागतो जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:46 IST

विदर्भ आणि मराठवाड्याला वेगळे करणारी पैनगंगा नदी यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते

अविनाश खंदारे

उमरखेड (यवतमाळ) - प्रशासनातील अधिकाऱ्यांची, सत्तेतील नेत्यांची मुलं ड्रायव्हरला सोबत घेऊन पॉश कारमधून शाळेत जातात. तरी ती मुलं घरी परतेपर्यंत या श्रीमंत पालकांचा जीव थाऱ्यावर नसतो. तर त्याचवेळी काही खेड्यातील मुलं चक्क जीव धोक्यात घालून दुथडी भरलेली नदी ओलांडून शाळेत पोहोचतात.

गोरगरिबांच्या शिक्षणाचाखेळखंडोबा सुरू आहे. शिक्षणाची ही थरारक घटना विदर्भ-मराठवाड्याच्या सीमावर्ती गावातील आहे. नांदेड जिल्ह्यातील दिघी आणि इतर तीन-चार गावात फक्त प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. उच्च  प्राथमिक शिक्षणासाठी तेथील चिमुकल्यांना यवतमाळ जिल्ह्यातील चातारी (ता. उमरखेड) गावातील शाळेत यावे लागते. दिघीच नव्हेतर वीरसनी, वाघी, टेंभुर्णी, घारापूर, खडकी, जवळगाव या गावातील विद्यार्थ्यांनाही चातारीच्या शाळेत आल्याविना पर्याय नाही. साध्या प्राथमिक शिक्षणासाठी दररोज परगावी पायी जाणाऱ्या या पोरा-पोरींसाठी शासनाने रस्ताही दिला नाही. वाहतुकीची साधनेही उपलब्ध करून दिली नाही. पण या गरिबांच्या शिक्षणात याहीपेक्षा मोठा अडथळा आहे, तो प्रचंड विस्तारीत पात्र असलेल्या पैनगंगा नदीचा. 

विदर्भ आणि मराठवाड्याला वेगळे करणारी पैनगंगा नदी यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. हेच नदीपात्र दिघी परिसरातून चातारीला येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही वाट अडविते. कारण या नदीवर पूलच बांधण्यात आलेला नाही. विद्यार्थी नदीपर्यंत काही किलोमीटर पायी येतात. नदीजवळ आल्यावर रूखात (अगदी छोटी लाकडी नाव) बसतात. वाहत्या वेगवान पाण्याचे हेलकावे खात हळूहळू पैलतिरी पोहोचतात. नदी कशीबशी ओलांडल्यावर पुन्हा पायी चालत चातारीतल्या शाळेपर्यंत पोहोचतात. पण संततधार पाऊस असला तर या रुखातून प्रवास अशक्य होतो. अनेकदा शाळेत गैरहजेरी लागते.

 रुखात बसून प्रवास करणे म्हणजे, जीवावरची जोखीम. ही छोटी बोट कधी उलटेल अन् कधी जीव जाईल याचा नेम नाही. त्यामुळे नदीपात्रावर पूल बांधण्याची मागणी गेल्या 30 वर्षांपासून केली जात आहे. मात्र ना पूल झाला ना दिघी परिसरात शाळा झाल्या. गोरगरिबांच्या शिक्षणाच्या बाबतीत आणि जीवनाच्याही बाबतीत लोकप्रतिनिधी, प्रशासन उदासीन आहे. 

गरिबी आणि शिक्षणात ‘सेतू’ बांधा

सकाळी मुलांना ‘रेडी’ करून पालक त्यांना शाळेत पोहोचविण्यासाठी धडपडतात. स्वत:ची कार, दुचाकी तेही नसेल तर स्कूलबसमधून गावातल्या गावात प्रवास करणाऱ्या या पोरांबाबत आईबाबांच्या मनात प्रचंड काळजी असते. मुल घरी परतेपर्यंत चिंता कायम असते. पण याच महाराष्ट्रातल्या काही खेड्यातली मुले जंगल, नदी ओलांडून पालकांशिवाय एकटेच परगावातील शाळेत जातात. घरातून पायी निघणाºया या पोरांसाठी धड रस्ताही नाही. बरं कोटे-गोटे तुडवित जाणाऱ्या या मुलांची वाट पुन्हा अडविते ती दुथडी भरून वाहणारी पैनगंगा नदी. माणसाच्या उंचीएवढे पाणी असलेली नदी ओलांडण्यासाठी पूलही नाही. रुखातून जाताना कधीही नदीत बुडण्याची भीती असते. ग्रामीण विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा दावा शासन सातत्याने करीत असते. पण दुसरीकडे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना अक्षरश: जीवावर उदार होऊन शाळेपर्यंत पोहोचावे लागत आहे. गोरगरिबांची मुले आणि दर्जेदार शिक्षण ही दोन टोके जोडण्यात शासनाला अद्यापही यश आलेले नाही.

 

टॅग्स :YavatmalयवतमाळEducationशिक्षणriverनदी