शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाला घेराव आंदोलन करणार

By admin | Updated: August 4, 2014 23:57 IST

ओबीसी, एसबीसी, व्हिजेएनटी प्रवर्गातील नागरीक आणि विद्यार्थ्यांना घटनादत्त अधिकार व हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आपले मूलभूत अधिकार पदरात पाडून घेण्यासाठी ३२

यवतमाळ : ओबीसी, एसबीसी, व्हिजेएनटी प्रवर्गातील नागरीक आणि विद्यार्थ्यांना घटनादत्त अधिकार व हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आपले मूलभूत अधिकार पदरात पाडून घेण्यासाठी ३२ संघटनांकडून येथील सामाजिक न्याय विभागाला घेराव घालण्यात येणार आहे. १३ आॅगस्टला सकाळी ११ वाजता येथील आझाद मैदानातून या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती या आंदोलनाचे प्रमुख जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.देवानंद पवार म्हणाले, नॉन क्रिमीलेअरची अट रद्द करा, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची ताबडतोब निर्मिती करा, ओबीसी प्रवर्गाची राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर जनगणना व्हावी, सेट परीक्षेत बी प्लस ५० टक्के गुणांवर निश्चित करा, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीत भरीव वाढ करा, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती तत्काळ सुरू करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ओबीसी, एसबीसी आणि व्हिजेएनटी यांना आरक्षण दिले. मात्र या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. राज्यकर्ते सकारात्मक विचाराचे नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुमारे ३२ संघटनांनी आपल्या न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी हा लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रपरिषदेला चारूलता पावसेकर, डॉ. दिलीप घावडे, संजय निकडे, ज्ञानेश्वर गोबरे, उत्तम गुल्हाने, माधुरीताई अराठे, डॉ. दिलीप महाले, छायाताई महाले, रमेश आंबेपवार, शैलेश इंगोले, गजानन पाथोडे, अमर राठोड, अरूण पाचकवडे, प्रा. सविता हजारे, ज्योती निरपासे, माया गोबरे यांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)