शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

६८२ गावात पाणीटंचाईची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील ६८२ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी ...

ठळक मुद्देनऊ कोटींचा कृती आराखडा : ७०६ उपाय योजनांसाठी तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ६८२ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी नऊ कोटींच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या निधीमधून ७०६ उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.यावर्षी बरसलेला पाऊस अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. बरसलेला हा पाऊस जमिनीत पाहिजे तसा मुरलाच नाही. परिणामी येत्या उन्हाळ्यात पुन्हा भीषण टंचाई निर्माण होणार आहे.भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ६८२ गावामध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याकरिता ७०६ उपाययोजना जिल्हा प्रशासनाला कराव्या लागणार आहे. त्याकरिता नऊ कोटी १२ लाख रूपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.जिल्ह्यात १४ तात्पुरत्या पुरक नळ योजना, २४ नळ योजनांची विशेष दुरूस्ती, ४७५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. ३६ गावामध्ये टँकर आणि बैलगाडीच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासह विविध उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी हा राखीव निधी खर्ची घातला जाणार आहे. पाणीटंचाईच्या काळात स्थानिक स्तरावरून काही प्रस्ताव आल्यास त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.कोट्यवधीच्या खर्चानंतरही टंचाईपाणीटंचाईचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघावा म्हणून जलयुक्त शिवार योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पाटसऱ्या, शेततळे, माथा ते पायथा, बांध बंदिस्ती या सारख्या विविध उपाययोजना करण्यात आल्या. यावर कोट्यवधीचा खर्च झाला. यानंतरही जिल्ह्यात पाणीटंचाई कायमच आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई