शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

सात हजार कृषिपंप वीज पुरवठ्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:00 AM

कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीवर भर दिला आहे. शेतकऱ्यांच्या या स्वप्नाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृषीपंपाला वीज उपलब्ध नसल्याचे विरोधाभासी चित्र आहे. वीज वितरण कंपनीने कृषिपंपासाठी अतिरिक्त डीपीची मागणी केली. मात्र डीपीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्याच कंपनीला करता आल्या नाही.

ठळक मुद्देएक हजार शेतकऱ्यांना हवे सौरऊर्जा पंप : अतिउच्चदाब वीज वाहिन्यांनी वाढविल्या अडचणी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सिंचन विहिरींची संख्या दिवसेन्दिवस वाढत असून वीज पुरवठ्यासाठी वीज वितरणकडे दररोज शेकडो अर्ज येत आहेत. मात्र सात हजार शेतकऱ्यांना अजूनही कृषिपंपाची वीज जोडणी मिळाली नाही.कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीवर भर दिला आहे. शेतकऱ्यांच्या या स्वप्नाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृषीपंपाला वीज उपलब्ध नसल्याचे विरोधाभासी चित्र आहे. वीज वितरण कंपनीने कृषिपंपासाठी अतिरिक्त डीपीची मागणी केली. मात्र डीपीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या वीज जोडण्याच कंपनीला करता आल्या नाही. आता पाणी आहे, पण वीज नाही. अशा स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सिंचन करायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.उच्चदाब वाहिनीवरील डीपी योजनेच्या माध्यमातून २०१८ मध्ये पाच हजार ७४७ जोडण्या द्यायच्या होत्या. हे वीज कनेक्शन त्यावेळी गोठविण्यात आले. सध्या यातील तीन हजार ७३२ कनेक्शन जोडण्यात आले आहे. ११७२ वीज कनेक्शनचे काम प्रगतीपथावर आहे. या व्यतिरिक्त २०१८ ते २०२० या कालावधीत कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी सात हजार नवीन अर्ज आले आहेत. पण वीज कंपनीने अद्यापही वीज पुरवठा न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.शेतकऱ्यांचा कल सौरपंपाकडेकृषी फिडरवर १६ तासांचे भारनियमन आहे. त्या व्यतिरिक्तही अनेकदा वीज पुरवठा खंडीत होतो. यामुळे शेतकºयांना सिंचन करताना अडचणीचा सामना करावा लागतो. यावर प्रभावी उपाय म्हणून शेतकरी सौरपंपाची मागणी करीत आहे. मुख्यमंत्री सौरपंप योजना आणि अटल सौरपंप योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहे. १०७५ अर्ज मुख्यमंत्री सौरपंप योजनेतून आले आहेत. अटल सौरपंप योजनेतून ६४४ अर्ज दाखल झाले आहे.डीपी उपलब्ध होताच वीज जोडणी देण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्या दृष्टीने वीज कंपनीचे कामकाज सुरू आहे. मात्र डीपी नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.- सुरेश मडावीअधीक्षक अभियंता,वीज वितरण कंपनी

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज