शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

दीड लाख नागरिकांची सुरक्षा ४६ पोलिसांवर

By admin | Updated: May 23, 2015 00:15 IST

आर्णी पोलीस ठाणे परिक्षेत्र ब वर्गात येत असून आर्णी शहरासह ८३ गावे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतात. ....

गुन्हेगारीत वाढ : पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताणराजेश कुशवाह आर्णीआर्णी पोलीस ठाणे परिक्षेत्र ब वर्गात येत असून आर्णी शहरासह ८३ गावे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतात. तालुक्याची लोकसंख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. आर्णी पोलीस ठाण्यात एकूण ४६ कर्मचारी कार्यरत आहे. या ४६ कर्मचाऱ्यांच्या भरोशावर दीड लाख नागरिक आहेत. त्यामुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.आर्णी पोलीस ठाण्यातील एकूण ४६ कर्मचाऱ्यांपैकी चार अधिकारी व चार महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्याचा विस्तार सहा बीटमध्ये विभागला आहे. आर्णी शहरात दोन बीट चार कर्मचारी, बोरगाव बीटमध्ये दोन कर्मचारी, जवळा बीटमध्ये तीन कर्मचारी, लोणी बीटमध्ये दोन कर्मचारी, महागावमध्ये दोन कर्मचारी अशा प्रकारे एकूण सहा बीटमध्ये १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी तीन कर्मचारी, गुन्हे विभागात तीन कर्मचारी, वायरलेसमध्ये दोन कर्मचारी व चालक म्हणून दोन कर्मचारी कार्यरत आहे. त्यानंतर दैनंदिन कामकाजासाठी केवळ सहा कर्मचारी उरतात. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचे विभाजन करण्यात आले आहे.अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तालुक्यातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी ठाणेदाराला मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची अधिक पदे निर्माण करावी, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. आर्णी तालुका हा नक्षलग्रस्त असून शहरातून जाणारा राज्य महामार्ग क्र.७ मोठा वर्दळीचा आहे. त्यामुळे दुर्घटना ही सतत घडत असतात. यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासते. शहर व शहराबाहेरील पेट्रोलिंग, गस्त, नाकाबंदी आदींमध्ये कर्मचाऱ्यांचा नाकिनऊ येते. २०१० मध्ये १८७ गुन्हेगारीच्या घटना घडल्या होत्या. २०१४ मध्ये ५३४ तर २०१५ मध्ये भाग एक ते पाचमध्ये १६६ क्राईमच्या घटना घडल्या आहे. आर्णी ठाणेदारांनी नवीन इमारत व वाढीव कर्मचाऱ्यांसाठी प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार ख्वाजा बेग यांच्यामार्फत करण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांचे तथा विकासात्मक कामाचे नियोजन करण्यात येणार असल्याने आमदार ख्वाजा बेग यांनी आर्णी पोलिसांची बैठक घेऊन हा विषय चर्चिला होता. तालुक्याच्या जनतेच्या संरक्षणार्थ तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी वाढीव कर्मचाऱ्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन बेग यांनी दिले आहे. 'आमदारांच्या बैठकीत पोलीस समस्यांवर चर्चाकेवळ ४६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरोशावर तालुक्यातील दीड लाख नागरिकांची सुरक्षितता आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायसुद्धा वाढले आहे. ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून असताना लोकप्रतिनिधींनी याकडे कधीही लक्ष दिले नाही. गुन्हेगारी, अवैध प्रवासी वाहतूक, दारू व जुगाराचे प्रमाण, वरली मटका, भांडण तंटे आदींचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची नवीन पदे निर्मिती करणे आर्णी तालुक्यात अतिशय गरजेचे झाले आहे. याकडे विद्यमान लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.