शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख नागरिकांची सुरक्षा ४६ पोलिसांवर

By admin | Updated: May 23, 2015 00:15 IST

आर्णी पोलीस ठाणे परिक्षेत्र ब वर्गात येत असून आर्णी शहरासह ८३ गावे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतात. ....

गुन्हेगारीत वाढ : पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताणराजेश कुशवाह आर्णीआर्णी पोलीस ठाणे परिक्षेत्र ब वर्गात येत असून आर्णी शहरासह ८३ गावे या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतात. तालुक्याची लोकसंख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. आर्णी पोलीस ठाण्यात एकूण ४६ कर्मचारी कार्यरत आहे. या ४६ कर्मचाऱ्यांच्या भरोशावर दीड लाख नागरिक आहेत. त्यामुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.आर्णी पोलीस ठाण्यातील एकूण ४६ कर्मचाऱ्यांपैकी चार अधिकारी व चार महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्याचा विस्तार सहा बीटमध्ये विभागला आहे. आर्णी शहरात दोन बीट चार कर्मचारी, बोरगाव बीटमध्ये दोन कर्मचारी, जवळा बीटमध्ये तीन कर्मचारी, लोणी बीटमध्ये दोन कर्मचारी, महागावमध्ये दोन कर्मचारी अशा प्रकारे एकूण सहा बीटमध्ये १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी तीन कर्मचारी, गुन्हे विभागात तीन कर्मचारी, वायरलेसमध्ये दोन कर्मचारी व चालक म्हणून दोन कर्मचारी कार्यरत आहे. त्यानंतर दैनंदिन कामकाजासाठी केवळ सहा कर्मचारी उरतात. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचे विभाजन करण्यात आले आहे.अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तालुक्यातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी ठाणेदाराला मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची अधिक पदे निर्माण करावी, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. आर्णी तालुका हा नक्षलग्रस्त असून शहरातून जाणारा राज्य महामार्ग क्र.७ मोठा वर्दळीचा आहे. त्यामुळे दुर्घटना ही सतत घडत असतात. यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासते. शहर व शहराबाहेरील पेट्रोलिंग, गस्त, नाकाबंदी आदींमध्ये कर्मचाऱ्यांचा नाकिनऊ येते. २०१० मध्ये १८७ गुन्हेगारीच्या घटना घडल्या होत्या. २०१४ मध्ये ५३४ तर २०१५ मध्ये भाग एक ते पाचमध्ये १६६ क्राईमच्या घटना घडल्या आहे. आर्णी ठाणेदारांनी नवीन इमारत व वाढीव कर्मचाऱ्यांसाठी प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा आमदार ख्वाजा बेग यांच्यामार्फत करण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांचे तथा विकासात्मक कामाचे नियोजन करण्यात येणार असल्याने आमदार ख्वाजा बेग यांनी आर्णी पोलिसांची बैठक घेऊन हा विषय चर्चिला होता. तालुक्याच्या जनतेच्या संरक्षणार्थ तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी वाढीव कर्मचाऱ्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन बेग यांनी दिले आहे. 'आमदारांच्या बैठकीत पोलीस समस्यांवर चर्चाकेवळ ४६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरोशावर तालुक्यातील दीड लाख नागरिकांची सुरक्षितता आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायसुद्धा वाढले आहे. ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून असताना लोकप्रतिनिधींनी याकडे कधीही लक्ष दिले नाही. गुन्हेगारी, अवैध प्रवासी वाहतूक, दारू व जुगाराचे प्रमाण, वरली मटका, भांडण तंटे आदींचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची नवीन पदे निर्मिती करणे आर्णी तालुक्यात अतिशय गरजेचे झाले आहे. याकडे विद्यमान लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.