शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सुधारणांसाठी विज्ञान विकसित केले पाहिजे

By admin | Updated: April 12, 2015 00:01 IST

मंगळावर यशस्वीपणे यान पाठविण्याइतपत प्रगती भारताने केली आहे.

बेजवाडा विल्सन : ‘समता पर्वात’ बहुजनांच्या हक्कावर मार्गदर्शनकाशीनाथ लाहोरे  यवतमाळमंगळावर यशस्वीपणे यान पाठविण्याइतपत प्रगती भारताने केली आहे. इतरही क्षेत्रात नेत्रदीपक प्रगतीचा आलेख वाढत आहे. असे असताना आजही जाती व्यवस्थेमुळे काही कामांसाठी विशिष्ठ वर्गालाच गृहीत धरले जाते. मानवी मलमूत्राची विल्हेवाट आजही माणसांकडून करून घेतली जाते. माणुसकीला काळिमा असणाऱ्या या कामाच्या पद्धतीत बदल करावा, असे प्रस्थापितांना वाटतच नाही. आत्मसन्मानाने जगण्याची संधी सर्वांना दिली पाहिजे. भारतीय घटनेने ती दिली असली तरी भारतातील अनेक कायदे हे केवळ कागदावरच आहे. सफाईचे काम कोणीही खुशीने करीत नाही, असे प्रतिपादन मानवी हक्क आंदोलन तथा सफाई कामगार आंदोलनाचे नेते बेजवाडा विल्सन (दिल्ली) यांनी केले. महात्मा फुले-डॉ. आंबेडकर समता पर्वात राजर्षी शाहू महाराज समता परिसरात पहिल्या समता विचारवेध सत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्न व औषधी प्रशासन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चोथरीराम यादव (बनारस), नरेंद्र फुलझेले, ज्ञानेश्वर गोबरे, मायाताई गोबरे, मंगला दिघाडे, दीपक नगराळे, मधुकर भैसारे, मन्सूर एजाज जोश आदी विचारपीठावर उपस्थित होते. प्रा. चोथरीराम यादव म्हणाले, हजारो वर्षांपासूनच्या सवर्णांच्या गुलामगिरीतून मुक्त होणे हा बहुजनांचा जन्मसिद्ध हक्क आहे. अघोषित आरक्षणाचा लाभ सवर्णांनी हजारो वर्षांपासून घेतला आहे. एकविसावे शतक हे फुले-आंबेडकरांचे शतक असून फुलेंच्या सत्यशोधक विचारधारेचा प्रवाह म्हणजे समता पर्व आहे. डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, सफाई कामगारांसाठीचा कायदा बनविण्यात बेजवाडा विल्सन यांचा मोठा सहभाग आहे. अधिकाराच्या पदावर असल्याने मला त्यांचे काम पुढे रेटता आले एवढेच. यापुढे रेल्वेच्या डब्यांना जैविक शौचालय लावले जाणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. ‘क्षण एक गौरवाचा’ या मालेत बेजवाडा यांचा सन्मान अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. चाथरीराम यांनाही सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी यवतमाळातील स्त्री-पुरुष सफाई कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मिलिंद भगत यांनी त्यांचा परिचय करून दिला. विनोद बुरबुरे यांनी संपादित केलेल्या ‘समता पर्व’ या साप्ताहिकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. समता पर्वाच्या वेबसाईटचेही लोकार्पण करण्यात आले. समता पर्व, स्मृतिपर्वाच्या धर्तीवर नवरात्रात युवापर्व घेण्याची संकल्पना यावेळी अध्यक्षांनी मांडली. संचालन अंकुश वाकडे यांनी केले.