शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून प्रवाशांच्या सुरक्षेचा होतोय बिनधोक लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2022 22:19 IST

नाशिक दुर्घटनेत जखमी झालेले व ठार झालेल्या प्रवाशांपैकी केवळ ३० जणांनाच वाहन विमा कंपनीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित २५ जणांना झालेल्या दुखापती व जीवितहानीची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आपले आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या परिवहन विभागाने १२ जीवांचा बळी दिला आहे. त्यामुळे या चौकशीत स्थानिक अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथून महानगरात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासावर नागरिकांचा आतापर्यंत विश्वास होता. मात्र नाशिक दुर्घटनेनंतर प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिवहन विभाग अक्षरश: सामान्य नागरिकांच्या जिवाचा लिलाव करीत असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. प्रवासी क्षमता ३० असताना  तब्बल ५५ प्रवासी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत असल्याचे उघड झाले आहे. हा अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रकार परिवहन विभागाच्या संमतीनेच सुरू असल्याचे पुढे आले आहे. ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकिटांचा अक्षरश: लिलाव केला जातो. सणासुदीच्या काळात तर मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे वसूल केले जातात. एकीकडे ही मनमानी असताना प्रवासी सुरक्षिततेकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष केले जाते. क्षमतेच्या दुप्पट-तिप्पट प्रवासी कोंबून १० ते १५ तासांचा प्रवास करण्यास भाग पाडले जाते. प्रवासाची पर्यायी साधने नाहीत, ही बाब ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना चांगली ठाऊक आहे. यातूनच प्रवाशांच्या जीविताशी खेळणारे चक्र सुरू झाले आहे. परिवहन विभागाने प्रवासी वाहतुकीची सुरक्षा वारंवार तपासणे आवश्यक आहे. मात्र आजतागायत एकाही ट्रॅव्हल्सला अपवादानेही अतिरिक्त प्रवासी भरल्याबाबतचा मेमो देण्यात आलेला नाही. नाशिक दुर्घटनेत जखमी झालेले व ठार झालेल्या प्रवाशांपैकी केवळ ३० जणांनाच वाहन विमा कंपनीचा लाभ मिळणार आहे. उर्वरित २५ जणांना झालेल्या दुखापती व जीवितहानीची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आपले आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या परिवहन विभागाने १२ जीवांचा बळी दिला आहे. त्यामुळे या चौकशीत स्थानिक अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी. ट्रॅव्हल्स मालकांकडून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे. चालक व वाहकाने रस्त्याने अतिरिक्त प्रवासी भरले, असे बेजबाबदारीचे उत्तर दिले जात आहे. या प्रकरणात फौजदारी संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, असेही विधिज्ञांकडून सांगितले जात आहे. 

नाशिक अपघातात जिल्ह्यातील मृतांची संख्या झाली तीन - नाशिक येथे झालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातात अज्ञात मृतांची ओळख पटविणे सुरू आहे. शनिवारी अजय कुचनकर (१६) रा. मांगरुळ, ता. मारेगाव याची ओळख पटली होती. रविवारी आलेल्या यादीत पुसद येथील सुरेश लक्ष्मण मुळे या मृताची ओळख पटली आहे. तर यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथील हरी तुकाराम भिसनकर (२४) या युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यासाठी त्याच्या पत्नीला बोलविण्यात आले. मात्र तिलाही जळालेला मृतदेह ओळखता आला नाही. आता डीएनए चाचणीद्वारे संशयित मृतदेह हरीचाच आहे काय हे निश्चित केले जाणार आहे. तूर्त तरी शासकीय रेकाॅर्डप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हरी तुकाराम भिसनकर याच्याबाबतची चौकशी सुरू आहे. त्यात तथ्य आढळल्यास त्यालाही मृत जाहीर केले जाईल.

 

टॅग्स :Accidentअपघातfireआग