आर्णीच्या प्रतिबंधित भागाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:00:07+5:30
रविवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार धीरज स्थूल, मुख्याधिकारी अमोल माळकर, ठाणेदार यशवंत बावीस्कर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील भवरे, डॉ.श्याम शिंदे आदींनी महालक्ष्मीनगर परिसराला भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यंत्रणा या परिसरावर नजर ठेवून आहे. घरोघरी आरोग्य सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांच्या घरी यंत्रणेतर्फे जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या जात आहे.

आर्णीच्या प्रतिबंधित भागाचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने महालक्ष्मीनगर सील करण्यात आले. रविवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यांनी शहराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
शहरातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनाने महालक्ष्मीनगर परिसर सील केला आहे. या परिसरातील ८९ कुटुंबातील ३६९ जणांना रविवारी रात्री क्वारंटाईन करण्यात आले. त्यापैकी हाय रिस्कमधील सात जणांचा समावेश आहे. या सर्व ४९ जणांना तालुक्यातील कोपरा येथील कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
रविवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार धीरज स्थूल, मुख्याधिकारी अमोल माळकर, ठाणेदार यशवंत बावीस्कर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील भवरे, डॉ.श्याम शिंदे आदींनी महालक्ष्मीनगर परिसराला भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यंत्रणा या परिसरावर नजर ठेवून आहे. घरोघरी आरोग्य सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांच्या घरी यंत्रणेतर्फे जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या जात आहे.
कोपरा येथील कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव
अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यांनी रविवारी प्रतिबंधित भागाला भेट दिली. त्यांच्यासमोर काही क्वारंटाईन नागरिकांनी कोविड सेंटरमध्ये पोटभर जेवण मिळत नसल्याची ओरड केली. यावेळी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. तथापि प्रतिबंधित भागात दोनदा सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. या परिसरातील घरोघरी दूध, किराणा, भाजीपाला, दळण आदी घरपोच पोहोचविले जात आहे. विशेष म्हणजे, पाळीव प्राण्यांनासुद्धा घरपोच पाणी व भोजन पुरविले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.