शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर अवकळा

By admin | Updated: October 12, 2014 23:37 IST

बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर भारनियमन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अवकळा आली आहे. ३० उद्योग तर अखेरच्या

पुसद : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुसद एमआयडीसीतील उद्योगांवर भारनियमन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अवकळा आली आहे. ३० उद्योग तर अखेरच्या घटका मोजत असून प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रीयतेने औद्योगिक विकासाचे स्वप्न भंगले आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने १९९२-९३ मध्ये पुसद येथे औद्योगिक वसाहत मंजूर झाली. दिग्रस मार्गावरील धुंदी घाटोळी परिसरात १६९ हेक्टर भूखंड घेण्यात आला. मुख्य रस्त्यालगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा मोठा फलक लावला आहे. फलकापासून दूरवर दिसणारी ओसाड जमीन आणि औद्योगिक वसाहत आपली व्यथा सांगताना दिसत आहे. उद्योगाच्या घरी रिद्धीसिद्धी पाणी भरी, असे म्हणतात, परंतु औद्योगिक वसाहतीत कोणी चिटपाखरुही फिरकताना दिसत नाही. या संपूर्ण परिसरात पसरलेली उदासीनता क्षणाक्षणाला जाणवते. सरकारी नोकरीचा ध्यास लावून बसलेल्या तरुणांना शासनाने उद्योजक होण्याचे आवाहन केले. परंतु येथील एमआयडीसी उद्योगासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजांची पूर्तताच केली नाही. त्यामुळे एमआयडीसीतील ९० टक्के भूखंड रिकामे आहे. सुरुवातीचे सहा वर्षतर या परिसरात एकही उद्योग आला नाही. १६ वर्षापूर्वी मोठा उद्योग नाही परंतु एका उद्योजकाने निंबाळी खताचा उद्योग उभारला. त्यानंतर हळूहळू ३० उद्योग या ठिकाणी सुरू झाले. त्यात तीन आईस फॅक्टरी, दोन बायोकोल, दोन मिनरल वॉटर पॅकिंग प्लाँट, कागद कारखाना, जिनिंग निंबाळी खत, सिमेंट वॉटर टँक, वीज खांब निर्मिती उद्योग, दूध डेअरी आदींचा समावेश आहे. सुरुवातीला भरभराटीस आलेल्या या उद्योगांना अलिकडे भारनियमनाचा मोठा फटका सहन करावा लागतो. कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने मशनरी नष्ट होण्याची भीती असते. तसेच उद्योगासाठी लागणारा पाणीपुरवठाही अनियमित आहे. त्यामुळे पाण्याचा साठा करावा लागतो. परंतु तेही शक्य होत नाही. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या आग्रहास्तव पुसदच्या एमआयडीसीला स्पेशल दर्जा देण्यात आला. परंतु सुविधा मात्र मिळाल्या नाही. या एमआयडीसीत विजेसाठी अतिरिक्त फिडरची गरज आहे. परंतु ही व्यवस्था येथे नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. वीज समस्येबाबत येथील उद्योजकांनी वारंवार वरिष्ठांना कळविले. परंतु कुणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे आता तर अनेकांनी येथील उद्योग गुंडाळण्याची तयारी चालविली आहे. यामुळे येथील उद्योगाला अखेरची घरघर लागली असून एमआयडीसी ओस पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)