शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

राजगृहावरील हल्ल्याचा ढाणकी येथे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:00 AM

राजगृहावरील हल्ल्याने महाराष्ट्रच नव्हे तर देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून ढाणकी येथे भीम टायगर सेनेतर्फे बिटरगाव पोलीस प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडीच्या काळात आंबेडकरी अनुयायांवर अत्याचार करण्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जातीयवादी मनोवृत्तीचे नागरिक बौद्ध बांधवांना लक्ष्य करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : देशातील आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली. या घटनेचा भीम टायगर सेनेने निषेध करून बिटरगाव ठाणेदारांना निवेदन दिले.राजगृहावरील हल्ल्याने महाराष्ट्रच नव्हे तर देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून ढाणकी येथे भीम टायगर सेनेतर्फे बिटरगाव पोलीस प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडीच्या काळात आंबेडकरी अनुयायांवर अत्याचार करण्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जातीयवादी मनोवृत्तीचे नागरिक बौद्ध बांधवांना लक्ष्य करीत आहे. यामुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. राजगृहावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय असून समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.या घटनेमागील मास्टर मार्इंड शोधून काढण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील सर्व बौद्ध स्थळांना सुरक्षा पुरवून आंबेडकरी जनतेवर होत असलेले हल्ले तातडीने पावले उचलून थांबविण्यात यावे, अन्यथा भीम टायगर सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष जॉन्टी विणकरे, नगरपंचायत सभापती संबोधी गायकवाड, समाधान राऊत व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर