विवाहावर होणारा अनाठाई खर्च टाळून कुंकू लावण्याच्या कार्यक्रमातच लग्न आटोपल्याचा पुरोगामी प्रकार तालुक्यातील मांजरी गावात घडला. या विवाहाबद्दल दोन्ही बाजूच्या शेतकरी कुटुंबाचे तालुक्यात कौतुक होत आहे. ...
जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांच्या मिसमॅच खात्याचा चेंडू आता मुंबई येथील आयटी विभागाकडे आहे. येत्या दोन दिवसांत हा विभाग ग्रीन लिस्ट प्रकाशित करणार आहे. ...
तालुक्याला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गारपीटीने तडाखा दिला. वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. या गारपिटीने तालुक्यातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ...
जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला. ...
यवतमाळ - जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात हे नुकसान यापेक्षाही मोठे असल्याचे शेतक-यांकडून सांगितले जात आहे. ...
तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक होऊ घातली आहे. आता पुन्हा एकदा तब्बल ९२ ग्रामीण वकिलांसह विदर्भातील १५ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. ...
शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. सलग दुसऱ्या दिवशीही निसर्गाचा प्रकोप कायम असल्याने शेतकरी हादरले आहे. ...
‘लोकमत सरपंच अवार्ड’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील स्टेट बँक चौकातील स्टेप इन हॉटेलमध्ये (हॉटेल मिडटाऊनजवळ) आयोजित आहे. या कार्यक्रमात गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांचा गौरव केला जाणार आहे. ...
आदिवासी असल्याचे भासवून अनेकांनी नोकऱ्या बळकावल्या आहे. त्यांना नोकरीतून काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही राज्य शासन कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे. ...