शिवशाहीला प्रवासी मिळावे यासाठी महामंडळाकडून त्रासदायक उपाय केले जात आहे. या प्रकारात प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर ‘लालपरी’ फलाटावर लागत असल्याने गर्दीतून प्रवासाची वेळ येत आहे. ...
रेतीघाट लिलावाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याच्या संधीचा फायदा घेत तस्करांनी लाखो रूपये किमतीच्या रेतीची चोरी सुरू केली आहे. चोरी रोखण्यात खनिकर्म विभागाला पूर्णत: अपयश आले आहे. तहसीलची यंत्रणाही अपयशी ठरली आहे. ...
तब्बल सहा वर्षानंतर शिक्षक भरती होण्याची चिन्हे असताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मात्र रिक्त जागा अत्यल्प दाखविण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी पायाभूत पदांची संख्या कमी दाखविण्याचे प्रयत्न सुरू असून संघटनांनी मात्र विरोध दर्शविला आहे. ...
रब्बी सिंचनासाठी पैनगंगा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोरी (चातारी) येथील पात्रात धरणे आंदोलन करणार आहे. ...
सर्वाधिक प्रामाणिक आणि शांतताप्रिय समाज म्हणून आदिवासी समाजाकडे पाहिले जाते. या समाजाचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी एक अजेंडा तयार करून त्याचा सतत पाठपुरावा करावा लागणार आहे. ...
मुलं सोडून गेली, कुणाला मुलंच नाहीत, कुणाला आहे पण पोसायला तयार नाहीत... मुंबई-पुण्यासारख्या शहरातच नव्हे, अशी एकाकी म्हातारी मंडळी खेड्यापाड्यातही आहे. अगदी आपल्या जिल्ह्यातल्या पार्डीनस्करी नावाच्या पाच पन्नास घरांच्या गावातही ही स्थिती आहे. ...
रस्ता रूंदीकरणासाठी राहती घरे पाडली जात असल्याने पर्यायी जागेसाठी लोहारा-वाघापूर बायपासवरील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी या नागरिकांची मागणी आहे. ...