आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील धान्य वाटपाचे निर्देश आहेत. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यावर आणि त्यातही निकृष्ट धान्य वाटप करून गरीब आदिवासींच्या आरोग्यासोबत खेळ केला जात आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. ३२ लाख ५२ हजारांचे प्रतिबंधित पान मटेरियल व वाहन असा ५२ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला. पोलिसांना मिळालेल्या टीपवरून हा ट्रक (एच.आर. ५५/के. ३११४) पांढरकवडा बायप ...
विविध भागात घरे, झोपड्या व तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या दुकानांचे अतिक्रमण हटविले जात आहे. कित्येकांवर पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिक आतापर्यंत घरातच होते. अजूनही त्यांचे व्यवसाय सुरु झालेले नाही. काहींनी कर्ज काढून उ ...
बसस्थानकावरून नेमक्या बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. सर्वच आगाराची ही परिस्थिती आहे. तरीही कर्मचाऱ्यांची गर्दी वाढविण्याचा प्रकार स्थानिक अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. काही वेळातर संचारबंदी काळात अर्थात पहाटे ६.३० वाजता कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली ह ...
मुंबई येथून पुसद तालुक्यातील धुंदी येथे परतलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने इसापूर व रुई येथे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे इसापूर, दत्तापूर, रुई (तलाव) व मरसूळ ही गावे सील केली. ३० नागरिकांना इसापूर येथील विलगीकरण कक्षात ठेवले गेले. ...
ऐन शाळा बंद होण्याच्या तोंडावर राज्यातील शाळांना ४२ कोटी रुपयांचा निधी मिळाला. शाळा बंद असताना या पैशाचा विनियोग नेमका कोणी आणि कसा केला, याचा हिशेब आता मागण्यात आला आहे. ...
लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प आहेत. हाताला कामच नसल्याने कुटुंबाची उपजीविका चालवायची कशी याचा पेच निर्माण झाला आहे. सेवाभावी संस्थांनी काही दिवस गोरगरिबांना जगविले. एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढते आहे. रोजगाराच्या निमित्ताने जि ...
‘यवतमाळ परिसरात १५ कोटींंच्या रेतीचा अवैध साठा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी घेतली. त्यांच्या आदेशावरून सकाळी ९ वाजतापासूनच उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे व ख ...
वादळी पावसाने बुधवारपासून तालुक्यात हजेरी लावली. बुधवारी तालुक्यात सरासरी ५७ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात ९१.५० मिमी पाऊस कोसळला. पेरणी योग्य मृगधारा बरसल्याने शेती मशागतीला वेग आला आहे. बळीराजा पेरणीच्या तयारीत व्यस्त झाला आहे. ४ जूनल ...