शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:09 PM

राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असताना मतभिन्नता असते, त्यांच्यामध्ये वेगवेगळी मते असतात. मतभेद जरूर असायला पाहिजे. परंतु मनभेद असायला नको. विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय बांधकाम आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देनितीन गडकरी । पांढरकवडा येथे ‘कृष्णामाई’चे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असताना मतभिन्नता असते, त्यांच्यामध्ये वेगवेगळी मते असतात. मतभेद जरूर असायला पाहिजे. परंतु मनभेद असायला नको. विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय बांधकाम आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते येथील सुराणा भवनमध्ये पांढरकवडाच्या पहिल्या माजी नगराध्यक्ष स्व. कृष्णाबाई कुळकर्णी यांच्या जीवन चरित्रावर लिहिलेल्या ‘कृष्णामाई’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पारवेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कांचन गडकरी, नगराध्यक्ष वैशाली नहाते, अ‍ॅड. भैय्यासाहेब उपलेंचवार, डॉ. अरूण कुळकर्णी, दीपक पतकी, रंजना लाभे, माधव लाभे उपस्थित होते. ना. गडकरी पुढे म्हणाले की, स्व. कृष्णाबाई कुळकर्णी यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले. जात, पात, पंथ, भाषा न पाहता त्यांनी गरिबातल्या गरीब माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच पांढरकवडा शहरवासीयांनी त्यांच्यावर प्रेम केले, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्रिपद आज आहे, उद्या नाही. आपले पद गेल्यावरही आपल्याला कोणीही विचारत नाही, असे म्हटले जाते. परंतु पद गेल्यावरही आपले सहकारी, आपले मित्र एवढेच नाही तर विरोधकांनी आपल्याला तोच सन्मान दिला पाहिजे आणि तो सन्मान आपल्याला मिळतो. याचा अनुभव आपल्याला आहे आणि म्हणूनच विरोधकांशीही सन्मानाने वागावे, विरोधक जरी असला तरी त्याचे काम आपण करतो, असेही ते म्हणाले. यावेळी पारवेकर, उपलेंचवार यांनीही आपले विचार मांडले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी