शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

अल्पसंख्यांक समाजातील ४५ हजार विद्यार्थिनींना मिळणार शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 12:36 IST

अल्पसंख्यांक समाजातील नववी ते बारावीतील मुलींसाठी केंद्र शासनामार्फत ही योजना राबविली जाते. यंदा पहिल्यांदाच योजनेत बदल करून ही शिष्यवृत्ती एनएसपी पोर्टलवर लाँच करण्यात आली.

ठळक मुद्देअल्पसंख्याक मुलींसाठीच्या राष्ट्रीय शिष्यवृत्तीची पहिल्यांदाच ऑनलाइन प्रक्रियाबेगम हजरत महल शिष्यवृत्ती ४५ हजार विद्यार्थिनींच्या बँक खात्यात येणार पैसे

अविनाश साबापुरे

यवतमाळ : अल्पसंख्याक समाजातील नववी ते बारावीत शिकणाऱ्या मुलींसाठी यंदा प्रथमच बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती एनएसपी पोर्टलद्वारे राबविली जात आहे. त्यात राज्यातील ४५ हजार ५४० विद्यार्थिनींची निवड झाली असून, त्यांच्या खात्यात लवकरच पैसे टाकले जातील, अशी माहिती शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.

२०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बेगम हजरत महल शिष्यवृत्ती योजनेसाठी ४८ हजार ५५५ विद्यार्थिनींचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पडताळणीनंतर ४५ हजार ५४० अर्ज पात्र ठरले आहेत. तर अटी पूर्ण न करणारे, कागदपत्रांची पूर्तता न करणारे तसेच अपूर्ण स्वरुपातील जवळपास तीन हजार अर्ज डिफेक्ट किंवा रिजेक्ट करण्यात आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.

मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन समाजातील इयत्ता नववी ते बारावीतील मुलींसाठी केंद्र शासनामार्फत ही योजना राबविली जाते. आजपर्यंत या शिष्यवृत्तीसाठी शाळांकडून थेट केंद्र शासनाकडे अर्ज सादर केले जात होते. मात्र, यंदा पहिल्यांदाच योजनेत बदल करून ही शिष्यवृत्ती एनएसपी पोर्टलवर लाँच करण्यात आली. तसेच अर्जांची पडताळणी करण्यासाठी शाळा आणि जिल्हा असे दोन टप्पे ठरविण्यात आले.

विशेष म्हणजे त्या-त्या राज्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले. महाराष्ट्रात अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालकांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. केंद्र शासनामार्फत अद्याप राज्यातील शिष्यवृत्तीचा कोटा ठरवून देण्यात आलेला नाही. तो नंतर ठरविला जाणार आहे. मात्र, सद्य:स्थितीतील अर्जांची संख्या पाहता महाराष्ट्राशेजारच्या राज्यांमध्ये अर्जांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तेथील उर्वरित कोटाही महाराष्ट्राला मिळून महाराष्ट्रात जेवढे अर्ज पात्र ठरतील त्या सर्वांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींना पाच हजार रुपये तर अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींना सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.

अर्ज पडताळणीच्या शेवटच्या टप्प्यात या योजनेची कार्यवाही आमच्याकडे सोपविण्यात आली. तरीही क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने पडताळणी पूर्ण करण्यात आली. केंद्राकडून निवड झालेल्या विद्यार्थिनीं बँक खात्यात लवकरच शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

-दिनकर पाटील, संचालक अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण, पुणे

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षणStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र