शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांना मागे टाकत नगरपरिषद शाळेची पटसंख्येत भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

जिल्हा परिषदेच्या तर ८१ शाळा बंद करण्याचा आदेशच शिक्षण विभागाला काढावा लागला होता. मात्र दारव्ह्याच्या नगरपरिषद शाळेने या सर्वांवर मात केली आहे. गावातील सर्व शाळांना मागे टाकत येथे पहिली ते दहावीच्या वर्गात १८५५ विद्यार्थी दाखल झाले. शिवाय कितीतरी विद्यार्थ्यांना इच्छा असूनही येथे प्रवेश मिळू शकला नाही.

ठळक मुद्दे१८५५ विद्यार्थी दाखल : प्रवेशासाठी आणाव्या लागतात शिफारशी, शिक्षक, मुख्याध्यापकांच्या मेहनतीचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा पटसंख्येविना बंद होत आहेत. तर दुसरीकडे काही शाळांनी मात्र दर्जेदार शिक्षणाचा पायंडा पाडून खासगी शाळांनाही मागे टाकले आहे. हाच आदर्श दारव्हा येथील नगरपरिषदेच्या शाळेने निर्माण केला आहे. गावात इंग्रजी माध्यमाच्या अनेक खासगी शाळा असूनही या नगरपरिषदेच्या शाळेत १८५५ इतक्या प्रचंड संख्येत विद्यार्थी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, राज्यभरातील नगरपरिषद शाळांमध्ये पटसंख्येच्या बाबतीत या शाळेचा दुसरा क्रमांक आहे.नगरपरिषद शाळेत जाणारा विद्यार्थी म्हणजे, गरीब पालकाने नाईलाजाने पाठविलेला विद्यार्थी, असेच सार्वत्रिक चित्र आहे. पण दारव्ह्यात तसे नाही. येथील नगरपरिषद शाळा क्रमांक दोनमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळावा, यासाठी चक्क आमदारांकडूनही शिफारस आणली जात आहे. तरीही यंदा या शाळेचे प्रवेश ‘फुल्ल’ झाल्याने अनेकांना प्रतीक्षा यादीतच राहावे लागले. यवतमाळ जिल्ह्यात एकीकडे नगरपरिषदेच्या अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडत आहे. जिल्हा परिषदेच्या तर ८१ शाळा बंद करण्याचा आदेशच शिक्षण विभागाला काढावा लागला होता. मात्र दारव्ह्याच्या नगरपरिषद शाळेने या सर्वांवर मात केली आहे. गावातील सर्व शाळांना मागे टाकत येथे पहिली ते दहावीच्या वर्गात १८५५ विद्यार्थी दाखल झाले. शिवाय कितीतरी विद्यार्थ्यांना इच्छा असूनही येथे प्रवेश मिळू शकला नाही.या शाळेची कीर्ती आता सर्वत्र पसरली असून नियोजन समितीमधून शाळेत भौतिक सुविधा वाढविण्यासाठी ५५ लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.दरवर्षी स्पर्धा परीक्षाही नगरपरिषद शाळा दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीच्या धर्तीवर स्पर्धा परीक्षा घेते. त्यातून ४५० विद्यार्थ्यांचा दरवर्षी गौरव केला जातो. शाळा व्यवस्थापन समिती, नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे सहकार्य त्यासाठी लाभते. अभ्यासक्रमासोबतच सहशालेय उपक्रमांतून विद्यार्थी घडविले जात आहे. त्यामुळे खासगी शाळा टाळून पालक आपल्या मुलांना या नगरपरिषदेच्या शाळेत टाकत आहेत.शनिवारी राज्यस्तरीय गौरवदारव्ह्याच्या नगरपरिषद शाळेची दखल आता राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघातर्फे राज्यातील २० शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात पहिला पुरस्कार कराड तर दुसरा पुरस्कार दारव्हा येथील शाळेला जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्टेंबर रोजी आळंदी येथे होणार आहे. शिवाय मुख्याध्यापक रमेश राठोड यांनाही आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाणार आहे.मी २०१३ मध्ये या शाळेत रूजू झालो तेव्हा ५९४ इतका पट होता. आता १८५५ आहे. आम्ही नियोजनबद्ध काम केले. तासिका पद्धतीने अध्यापन केले जाते. सर्व वर्गात सेमी इंग्रजी आहे. आमच्या शाळेतील बहुतांश शिक्षक नेट-सेट झालेले आहेत. सर्वंकष गुणवत्तेवर भर असल्याने आमच्या शाळेचा पट वाढत आहे.- रमेश राठोड, मुख्याध्यापक, नगरपरिषद शाळा, दारव्हा

टॅग्स :Schoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा