शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कळंब येथील शहीद स्मारक दुर्लक्षित अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 22:15 IST

इंदिरा गांधी चौकात शहीदांचे स्मारक ४६ वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत खितपत पडलेले आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे,....

ठळक मुद्देइंदिरा गांधी चौकात शहीदांचे स्मारक ४६ वर्षांपासून दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : इंदिरा गांधी चौकात शहीदांचे स्मारक ४६ वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत खितपत पडलेले आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी स्मारक समिती व गावकºयांची अनेक वर्षांपासूनची आहे़ परंतु स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज काळे व भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हा विषय विरोधी पक्षात असताना जोरकसपणे मांडला. एवढेच नव्हे तर उपोषणाचेही हत्यार उपसण्यात आले होते. त्यामुळेच मागासक्षेत्र अनुदान विकास निधीतून निधीची तरतूद करण्यात आली़ परंतु मागील सात वर्षांपासून स्मारक बांधकामाला मुहूर्तच सापडलेला नाही़ दुसरीकडे स्मारक समिती नेमणाºयांनी समिती स्थापण्यातच धन्यता मानली. त्यापुढे त्यांचे पाऊल सरकलेच नाही. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. आता तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. महत्वाचे म्हणजे ज्यांनी हा विषय सातत्याने उपस्थित केला तेच मनोज काळे आता उपनगराध्यक्ष आहे. बांधकाम सभापती आशिष धोबे हेही या समितीत आहे. त्यांच्याकडे मागील दोन वर्षांपासून सत्ता असनूही शहीद स्मारकाचा विषय बाजूला ठेवला आहे. विरोधी पक्षात असताना शहीद स्मारकासाठी रान उठवायचे आणि सत्तेत आल्यानंतर मूग गिळून बसायचे, ही कुठली कार्यपद्धती आहे, असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातो.देश पारतंत्र्यात असताना तालुक्यातील वीरांनी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेऊन लढ्यात उडी घेतली़ यामध्ये रामभाऊ महादेव माळी़, वासूदेव दाजीबा आष्टीकर, महादेव शिवराम माळी व चंपत मराठा या चौघांना वीर मरण आले़ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थच कळंब येथील इंदिरा गांधी चौकात १९७३ साली शहीद स्मारक उभारण्यात आले़ परंतु काळाच्या ओघात याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले़ परिणामी स्मारकाच्या सभोवताल अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले़ त्यामुळे हे स्मारक दिसेनासे झाले आहे. वास्तविकपणे शहीद स्मारकांचे सौंदर्यीकरण व स्मृती जपण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे़ परंतु तेही आपली जबाबदारी निट पार पाडताना दिसून येत नाही. मागील ४६ वर्षात मंत्री, खासदार-आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी स्मारकांच्या सौंदर्यीकरणासाठी अनेकदा आश्वासन दिले़ परंतु त्यांनी आपला शब्द पाळला नाही.