शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उमरखेड शहरात वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 22:39 IST

शहराच्या मध्यभागातून नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील असतानाही वाहतूक पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. अरुंद रस्त्यांवर मोकाट जनावरांचा कायमच ठिय्या असतो.

ठळक मुद्देअपघाताच्या घटना वाढल्या : वाहतूक पोलीस मात्र बेपत्ता

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहराच्या मध्यभागातून नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील असतानाही वाहतूक पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. अरुंद रस्त्यांवर मोकाट जनावरांचा कायमच ठिय्या असतो. त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.शहरातील रस्ते अतिशय अरुंद आहे. त्यातच अनेक रस्त्यांवर अतिक्रमणही वाढले आहे. मुख्य चौकात पोहोचणारे सर्व रस्ते अरुंद आहे. त्यामुळे चौकात येणाऱ्या वाहनांची एकच गर्दी होऊन अपघाताचा धोका वाढतो. मुख्य रस्त्यांना दुभाजक लावलेले आहे. परंतु या रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे दररोजच छोटेमोठे अपघात घडत आहेत. माहेश्वरी चौक, गायत्री चौक, बसस्थानक चौक, नगरपरिषद गार्डन परिसर, महागाव रोड, नांदेड रोड, ढाणकी रोड, पुसद रोड आदी ठिकाणी फेरीवाल्यांनी आपले दुकाने थाटलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा हातगाडीवाल्यांनी जागा काबीज केल्या आहे. संभाजी उद्यान ते माहेश्वरी चौक या दरम्यानच्या बोळ वजा अरुंद रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी आहे. तरीही तेथे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने सर्रास उभी केली जातात. माहेश्वरी चौकाच्या तिहेरी वळणावर अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने सतत उभी असतात. हा सर्व प्रकार पोलिसांना माहिती आहे. तरीही वाहतूक पोलीस गप्प का असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. पेट्रोल पंपापासून विश्रामगृहापर्यंत वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे.सुसाट तरुणांंना लगाम कोण घालणार?उमरखेड शहरातील अनेक तरुण सुसाट वेगाने वाहने चालवितात.परंतु त्यांना आवर घालण्याची जबाबदारी असलेले वाहतूक पोलीस ऐनवेळी बेपत्ता होतात. माहेश्वर चौक, पुसद रोड, महागाव रोड, नांदेड रोड, ढाणकी रोड आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांची ड्युटी लावली जाते. परंतु विस्कटलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे पोलीस कधीच कर्तव्य बजावताना दिसत नाही.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसAccidentअपघात