शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

मारेगावात 'जलजीवन'ची कामे रखडली; येत्या उन्हाळ्यात ग्रामस्थांनी कोठून पाणी आणावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:36 IST

Yavatmal : उन्हाळ्यात पाणी आणणार कोठून?, कंत्राटदाराची अनास्थ

लोकमत न्यूज नेटवर्क मारेगाव : तालुक्यातील अनेक गावांतील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ योजनेची कामे दोन वर्षांपासून रखडून पडली आहे. तेव्हा येत्या उन्हाळ्यात ग्रामस्थांनी कोठून पाणी आणावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नळयोजनेचे काम लवकरात लवकर उरकून घेणे आवश्यक असताना कंत्राटदाराला मात्र लक्ष देण्यास वेळच मिळत नाही, असे दिसते.

ग्रामस्थांना शुद्ध पाणी घरपोच मिळावे, यासाठी जलजीवन योजनेअंतर्गत नळ योजनेचे कामे तालुक्यात सुरू करण्यात आली. जलयोजनेचा उद्देश चांगला असला तरी कंत्राटदाराची मात्र नळयोजनेच्या बाबतीत उदासीनता दिसून येत आहे. तालुक्यातील बहुतांश भागात नळयोजनेसाठी रस्ते खोदून ठेवले आहेत; परंतु, नंतर ते दुरुस्तही करून दिले नाहीत.

त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील धामणी येथील योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी नळयोजनेचे काम सुरू करण्यात आले. गावातील रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्यात आली. टाकी बांधकाम पूर्ण केले गेले. मात्र टाकीत येणाऱ्या पाण्यासाठी आवश्यक असलेल्या विहिरीचे काम अद्यापही सुरू केले नाही. पाणी नसताना रस्ते खोदून नळ योजनेचे पाइप टाकणे आणि टाकीचे बांधकाम कशासाठी केले, असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहे. कमिशन खायला ही योजना सुरू केली काय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

आता डिसेंबरनंतर या गावात पाणीटंचाईला सुरुवात होते. त्यामुळे पाणीटंचाई सुरू होण्यापूर्वी ही अपुरे कामे पूर्ण करून पाणी उपलब्ध करून द्या, अशी मागणी अपुरे बांधकाम असलेल्या गावातील नागरिकांकडून केली जात आहे. अपुरी ठेवण्यात आलेली कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी तालुकयातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

"धामणी येथे टाकीचे व पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. गावात विहिरीसाठी जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे याठिकाणी ट्यूबवेल करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच नळ योजना कार्यान्वित करण्यात येईल." - प्रफुल्ल चिंतकुंटलवार, अभियंता जलजीवन मिशन.

"जलजीवन योजनेअंतर्गत धामणी गावातील रस्ते खोदून ठेवले आहेत; परंतु नळयोजनेचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. उन्हाळ्यापूर्वी पाण्याची व्यवस्था करावी एवढीच मागणी आहे." - धर्माजी मरस्कोल्हे, नागरिक.

"दोन वर्षांपूर्वी गावात जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. हे टाकीचे काम 'जैसे थे' आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नळाला पाणी येईल की नाही? याबाबत शंकाच आहे. अशा परिस्थितीत कंत्राटदार का लक्ष देत नाहीत, हेच कळायला मार्ग नाही." - श्रीकांत क्षीरसागर, नागरिक.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूकYavatmalयवतमाळ