शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

बस झाले पावसा, आता तरी थांब रे बा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:50 IST

मागील महिन्यापासून पावसाची सुरुवात झाली. त्यावेळी कपाशी, सोयाबीन, तूर पिके डोलत होती. शेतकरी आनंदी होते. सोयाबीनला चांगल्या शेंगा व ...

मागील महिन्यापासून पावसाची सुरुवात झाली. त्यावेळी कपाशी, सोयाबीन, तूर पिके डोलत होती. शेतकरी आनंदी होते. सोयाबीनला चांगल्या शेंगा व कपाशीने चांगली बोंडे धरली होती. त्यामुळे यावर्षी आपल्याला निश्चितच चांगले उत्पन होईल, असे स्वप्न शेतकरी बघत होते; परंतु सारख्या सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिसळले आहे.

पावसामुळे बोडांची सड सुरू झाली. प्रत्येक झाडाची दहा ते बारा बोंडे सडलेली दिसत आहेत. त्यामुळे आताच एकरी दोन क्विंटल उत्पन्न कमी झाले आहे. सोयाबीनच्या शेंगांचे सततच्या पावसामुळे दाणे पोचट होत आहेत. शेंगा काळ्या पडल्या आहेत. यामुळे सोयाबीन उत्पन्नातही घट येणार आहे. तुरीची झाडेही पिवळी पडली आहेत. संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

बॉक्स

कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज

सततच्या पावसामुळे पिकांचे नकसान होत आहे. मात्र, कृषी विभाग अद्याप सुस्त दिसत आहे. सोयाबीनला अंकुर फुटत आहेत. कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.