शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाकान पुनर्वसनाचा प्रश्‍न १७ वर्षांपासून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:28 IST

ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : ९ जुलै २००५ रोजी रात्री तालुक्यातील वाकान येथे दूधगंगा नदीला महापूर आला होता. त्यात ...

ज्ञानेश्वर ठाकरे

महागाव : ९ जुलै २००५ रोजी रात्री तालुक्यातील वाकान येथे दूधगंगा नदीला महापूर आला होता. त्यात क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आणि सर्व काही डोळ्यांदेखत वाहून गेलं. पुरामुळे ७१ कुटुंबे उघड्यावर पडली. मात्र, तब्बल १७ वर्षांनंतरही वाकान पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.

महापुरामुळे गावातील ७१ घरांना झळ बसली. ही कुटुंबे उघड्यावर आली. मोहन चंदू राठोड या अल्पभूधारक शेतकऱ्याचे सर्व काही डोळ्यांदेखत वाहून गेले. प्रचंड नैराश्य असताना त्यांनी जगण्याची उमेद व सकारात्मकता घेऊन व्यवस्था सावरेल, असा आशावाद बाळगला. मात्र, राजकीय नेत्यांची असंवेदनशीलता व अनास्था बाळगणारी प्रशासकीय यंत्रणा मोहन राठोड यांना न्याय देऊ शकली नाही.

या शेतकऱ्याचे घर, वाहून गेल्यानंतर त्याने लगतच्या गावामधील शाळेत आश्रय घेतला. नंतर नेत्यांच्या भेटीगाठी, अनेक सामूहिक निवेदने, नेते व प्रशासकीय यंत्रणांकडे या कुटुंबातील लोकांनी दिली. पुनर्वसन करून देण्याची मागणी केली. वेळोवेळी व्यवस्थेला आर्त हाक दिली. परंतु १७ वर्षे लोटूनही उपयोग झाला नाही. गावाच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला निवडणुकीत आश्वासन देऊन व्यवस्थित बगल दिली गेली. परिणामी ७१ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.

मोहन राठोड या अल्पभूधारक शेतकऱ्याचे जगणे प्रचंड नैराश्यात सापडले होते. त्यांनी लढता लढता आलेल्या अपयशाला व आपली कुणी दखल घेत नाही, या विवंचनेतून अखेर १३ सप्टेंबर २०१४ रोजी आत्महत्या केली. आजही त्यांचे कुटुंब त्याच शाळेत आसरा घेऊन आपली गुजराण करीत आहे. मोहन राठोडसारख्या संवेदनशील शेतकऱ्याला कठोर व्यवस्थेसमोर हतबल होऊन जीवन संपवावे लागले. त्यांच्या पश्चात पत्नी मंगीबाई ही दोन मुलांना घेऊन संसाराचा गाडा ओढत आहे.

बॉक्स

‘त्या’ पुराचा अनेक गावांना तडाखा

९ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुरात तालुक्यातील वाकानसह अमडापूर, तिवरंग व पुसद तालुक्यातील चोंडी बांशी गवांनाही तडाखा दिला होता. या गावांमध्ये हाहाकार उडाला होता. तत्कालीन पालकमंत्री मनोहरराव नाईक, उमरखेडचे आमदार उत्तमराव इंगळे, डॉ. एन. पी. हिराणी, जिल्हाधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. श्रीकर परदेशी, शेतकरी नेते मनीष जाधव आदींनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पुनर्वसनाबाबत आपद्ग्रस्तांशी चर्चा केली होती. चोंढी बांशी व शिरपूर येथील पुनर्वसनाचा मुद्दा निकाली निघाला. आपत्तीग्रस्तांना घरकूल मिळाले. मात्र, दुर्दैवाने तालुक्यातील वाकान येथील पुनर्वसनाचा मुद्दा आजही प्रलंबित आहे.

कोट

वाकान येथील विस्थापितांच्या दुरवस्थेला नेत्यांची निष्क्रियता जबाबदार आहे. आमदारांची याकडे पाहण्याची भूमिका अनास्थेची आहे. हा विषय १७ वर्षांपासून प्रलंबित आहे, हेच दुर्दैव आहे. हा जिल्हा प्रशासन व राज्यकर्त्यांचा नैतिक पराभव आहे. विस्थापितांचा व्यवस्थेवरील व नेत्यांवरील विश्वास उडाला आहे.

मनीष जाधव,

शेतकरी नेते वागद, ता. महागाव.

कोट

ज्याला घर नाही, अशांना ५०० स्क्वेअर फूट जागा देण्याची तरतूद आहे. परंतु, ग्राम पंचायत स्तरावरून तशी मागणी किंबहुना प्रस्ताव असेल तर तो पारित करता येतो. परंतु, अद्याप असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. पुनर्वसनासंदर्भात वाकान येथे सरपंच आणि ग्रामस्थांचा समन्वय नसल्याने पुनर्वसन प्रश्न प्रलंबित आहे. तिवरंग येथेसुद्धा हीच स्थिती आहे.

नामदेव ईसलकर, तहसीलदार, महागाव

कोट

राजकीय हेव्यादाव्यांमुळे गाव पातळीवर पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यासाठी सर्व पुरावे घेऊन माझ्या कार्यकाळात हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करेन.

अश्वजीत भगत,

सरपंच- वाकान, ता. महागाव.