शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वाकान पुनर्वसनाचा प्रश्‍न १७ वर्षांपासून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:28 IST

ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : ९ जुलै २००५ रोजी रात्री तालुक्यातील वाकान येथे दूधगंगा नदीला महापूर आला होता. त्यात ...

ज्ञानेश्वर ठाकरे

महागाव : ९ जुलै २००५ रोजी रात्री तालुक्यातील वाकान येथे दूधगंगा नदीला महापूर आला होता. त्यात क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आणि सर्व काही डोळ्यांदेखत वाहून गेलं. पुरामुळे ७१ कुटुंबे उघड्यावर पडली. मात्र, तब्बल १७ वर्षांनंतरही वाकान पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.

महापुरामुळे गावातील ७१ घरांना झळ बसली. ही कुटुंबे उघड्यावर आली. मोहन चंदू राठोड या अल्पभूधारक शेतकऱ्याचे सर्व काही डोळ्यांदेखत वाहून गेले. प्रचंड नैराश्य असताना त्यांनी जगण्याची उमेद व सकारात्मकता घेऊन व्यवस्था सावरेल, असा आशावाद बाळगला. मात्र, राजकीय नेत्यांची असंवेदनशीलता व अनास्था बाळगणारी प्रशासकीय यंत्रणा मोहन राठोड यांना न्याय देऊ शकली नाही.

या शेतकऱ्याचे घर, वाहून गेल्यानंतर त्याने लगतच्या गावामधील शाळेत आश्रय घेतला. नंतर नेत्यांच्या भेटीगाठी, अनेक सामूहिक निवेदने, नेते व प्रशासकीय यंत्रणांकडे या कुटुंबातील लोकांनी दिली. पुनर्वसन करून देण्याची मागणी केली. वेळोवेळी व्यवस्थेला आर्त हाक दिली. परंतु १७ वर्षे लोटूनही उपयोग झाला नाही. गावाच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला निवडणुकीत आश्वासन देऊन व्यवस्थित बगल दिली गेली. परिणामी ७१ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.

मोहन राठोड या अल्पभूधारक शेतकऱ्याचे जगणे प्रचंड नैराश्यात सापडले होते. त्यांनी लढता लढता आलेल्या अपयशाला व आपली कुणी दखल घेत नाही, या विवंचनेतून अखेर १३ सप्टेंबर २०१४ रोजी आत्महत्या केली. आजही त्यांचे कुटुंब त्याच शाळेत आसरा घेऊन आपली गुजराण करीत आहे. मोहन राठोडसारख्या संवेदनशील शेतकऱ्याला कठोर व्यवस्थेसमोर हतबल होऊन जीवन संपवावे लागले. त्यांच्या पश्चात पत्नी मंगीबाई ही दोन मुलांना घेऊन संसाराचा गाडा ओढत आहे.

बॉक्स

‘त्या’ पुराचा अनेक गावांना तडाखा

९ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुरात तालुक्यातील वाकानसह अमडापूर, तिवरंग व पुसद तालुक्यातील चोंडी बांशी गवांनाही तडाखा दिला होता. या गावांमध्ये हाहाकार उडाला होता. तत्कालीन पालकमंत्री मनोहरराव नाईक, उमरखेडचे आमदार उत्तमराव इंगळे, डॉ. एन. पी. हिराणी, जिल्हाधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. श्रीकर परदेशी, शेतकरी नेते मनीष जाधव आदींनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पुनर्वसनाबाबत आपद्ग्रस्तांशी चर्चा केली होती. चोंढी बांशी व शिरपूर येथील पुनर्वसनाचा मुद्दा निकाली निघाला. आपत्तीग्रस्तांना घरकूल मिळाले. मात्र, दुर्दैवाने तालुक्यातील वाकान येथील पुनर्वसनाचा मुद्दा आजही प्रलंबित आहे.

कोट

वाकान येथील विस्थापितांच्या दुरवस्थेला नेत्यांची निष्क्रियता जबाबदार आहे. आमदारांची याकडे पाहण्याची भूमिका अनास्थेची आहे. हा विषय १७ वर्षांपासून प्रलंबित आहे, हेच दुर्दैव आहे. हा जिल्हा प्रशासन व राज्यकर्त्यांचा नैतिक पराभव आहे. विस्थापितांचा व्यवस्थेवरील व नेत्यांवरील विश्वास उडाला आहे.

मनीष जाधव,

शेतकरी नेते वागद, ता. महागाव.

कोट

ज्याला घर नाही, अशांना ५०० स्क्वेअर फूट जागा देण्याची तरतूद आहे. परंतु, ग्राम पंचायत स्तरावरून तशी मागणी किंबहुना प्रस्ताव असेल तर तो पारित करता येतो. परंतु, अद्याप असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. पुनर्वसनासंदर्भात वाकान येथे सरपंच आणि ग्रामस्थांचा समन्वय नसल्याने पुनर्वसन प्रश्न प्रलंबित आहे. तिवरंग येथेसुद्धा हीच स्थिती आहे.

नामदेव ईसलकर, तहसीलदार, महागाव

कोट

राजकीय हेव्यादाव्यांमुळे गाव पातळीवर पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यासाठी सर्व पुरावे घेऊन माझ्या कार्यकाळात हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करेन.

अश्वजीत भगत,

सरपंच- वाकान, ता. महागाव.