शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावात वणीकरांना महागाईचाही डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

धान्याचा मागणी केल्यानंतरही पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भावात आम्हाला धान्याचा पुरवठा होत आहे, त्यात थोडी मार्जीन ठेवून धान्य विक्री करीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणी केल्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने धान्याची वाहने वणीत येत असल्याचेही एका दुकानदाराने सांगितले. एकीकडे जीवनावश्यक वस्तुंची चढ्या भावात विक्री करू नका, असे शासनातर्फे बजावण्यात आले असले, तरी किराणा व्यावसायिक मात्रं त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गंभीर बाब ही की, या व्यावसायिकांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी सुरू आहे.

ठळक मुद्देचढ्या भावाने धान्य विक्री। धान्याची आवक होत नसल्याची व्यापाऱ्यांची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वेगाने होत असताना लॉकडाऊनचा फायदा उचलत येथील धान्य व्यापारी चढ्या भावाने धान्याची विक्री करीत आहे. त्यातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे.यासंदर्भात काही व्यापाऱ्यांना विचारणा केली असता, धान्याचा मागणी केल्यानंतरही पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भावात आम्हाला धान्याचा पुरवठा होत आहे, त्यात थोडी मार्जीन ठेवून धान्य विक्री करीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणी केल्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने धान्याची वाहने वणीत येत असल्याचेही एका दुकानदाराने सांगितले. एकीकडे जीवनावश्यक वस्तुंची चढ्या भावात विक्री करू नका, असे शासनातर्फे बजावण्यात आले असले, तरी किराणा व्यावसायिक मात्रं त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गंभीर बाब ही की, या व्यावसायिकांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी सुरू आहे. लॉकडाऊनमधून केवळ किराणा दुकान, मेडिकल यांसह जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाºया प्रतिष्ठानांना सूट देण्यात आली आहे. कोरोनामुळे पुढे परिस्थिती काय राहील, याचे कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही. परिस्थिती चिघळली तर धान्याची दुकानेही बंद होतील, अशा भितीपोटीही काही लोक आपल्या घरात धान्याचा साठा करून ठेवत आहेत. याचाच फायदा किराणा व्यावसायिक उचलत असल्याचे चित्र वणी शहरात पहायला मिळत आहे.लॉकडाऊन पूर्वी सोयाबीन तेलाची १५ लिटरची कॅन १२५० रुपयांना मिळत होती. त्याचे भाव आता १४०० रुपयांवर पोहचले आहेत. तूर डाळ ८० रुपये किलोवरून ९५ रुपये प्रतिकिलो झाली आहे. दोन हजार ३०० रुपये क्विंटलाचा गहू दोन हजार ६०० ते दोन हजार ७०० रुपयांपर्यंत पोहचला आहे. पाच किलो आट्याची पिशवी १४० रुपयांवरून १६० रुपयांवर पोहचली आहे. अन्य डाळींचे भावदेखील ३० ते ४० रुपयांनी वाढले आहेत.भाजीपल्याचे भाव वधारलेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात भाजीपाल्याचेही भाव चांगलेच वाढले आहेत. २० रुपये किलो मिळणारा आलू आता ४० रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. अन्य भाज्यांच्या किंमतीही पाच ते १० रुपयांनी वाढविण्यात आल्याने गृहीणींचे बजेट बिघडले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या