शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

जनतेला लाभार्थी म्हणताना सरकारला लाज वाटली पाहिजे, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 17:58 IST

24 तास माध्यमांमध्ये झळकणारे मुख्यमंत्री यवतमाळात लपून छपून का आले?

यवतमाळ - यवतमाळ येते राष्ट्रवादी काँग्रेसनं आज हल्लाबोल यात्रेला सुरुवात केली. यावेळी झालेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. लाभार्थी म्हणताना सरकारला लाज वाटली पाहिजे, असं त्य म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला आज यवतमाळमधून सुरूवात झाली. यावेळी झालेल्या सभेत सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका करताना, लाभार्थी हा शब्द वापरताना सरकारला लाज वाटायला पाहिजे असं म्हटलं. जनता न्याय मागतेय आणि तो त्यांचा हक्कच आहे, त्यामुळे लाभार्थी म्हणणं चुकीचं आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सभेची सुरुवात  त्यांनी किटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या गजानन फुलमाळी यांची मुलगी प्रतिक्षा फुलमाळी हिच्या भाषणाने केली. फुलमाळी कुटुंबियांची सर्व जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याची घोषणा यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.  

या हल्लाबोल यात्रेत सुळेंव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मोदी आणि फडणवीस सरकराचा खरपूस समाचार घेतला. 

वाचा सभेत कोण काय म्हणाले ?

1. सुप्रिया सुळे, खासदार

  • शेतकरी विषबाधेने मेले नाही तर मग सरकार 2 लाखाची मदत का देतंय.
  • 24 तास माध्यमांमध्ये झळकणारे मुख्यमंत्री यवतमाळात लपून छपून का आले?
  • बोंडअळी ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही त्यांचे तक्रारींचे फॉर्म भरून घेतले नाही।
  • कर्जमाफीचे 6 हजार कोटी कुठे वाटले, कुण्या बँकेत गेले की पक्षाच्या खात्यात गेले?
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी घेऊन 302 कलम देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरेंवर लावायचे का? मुख्यमंत्र्यांना सवाल
  • 100 टक्के कर्जमाफी होईपर्यंत राकाँ स्वस्थ बसणार नाही.

 

2. अजित पवार काय म्हणाले 

  • सरकार कर्जबाजारी; शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मनस्थितीत नाही.
  • सरकार बोगस खोटारडं दिशाभूल करणारं
  • जनतेच्या करातून खोट्या जाहिराती दिल्या जातात
  • सोयाबीन मातीमोल भावात विकावा लागतोय
  • भ्रष्टाचारी अकार्यक्षम अपयशी कारभार
  • शेतकरी धर्म शेतकरी जात जगली पाहिजे.
  • मुख्यमंत्री बीड ला गेले त्यावेळी शेतकऱ्यांवर लाठीमार का?
  • कशाची मस्ती कशाची धुंदी आली आहे सरकारला।
  • भोगा कमळाची फळं असं म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

 

3. धनंजय मुंडे 

  • ज्या विदर्भाने भाजप ला भरभरून मतं दिले तिथेच सर्वाधिक आत्महत्या वाढल्या आहेत. मोदींनी शेतीमालाला भाव देण्याचा दिलेला शब्द फसवा निघाला.
  • किटकनाशकाने बोंडातली अळी मेली नाही मात्र शेतकरी मेला.
  • शेतमालाला भाव नसल्यानं सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत.
  • आत्महत्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे.
  • मोदींनी 15 लाख खात्यात जमा करण्याचा शब्द फिरवला.

4. जयंत पाटील, माजी मंत्री

  • शेतकऱ्यांच्या संपामुळे कर्जमाफी घोषणा सरकारने केली.
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चिंता नसल्यानेच सरकारकडून कर्जमाफी देण्यास चालढकल केली जात आहे.
  • विदर्भासाठी विदर्भातल्या मंत्र्यांनी कोणते उद्योग आणले ?
  • प्रसारमाध्यमं बघून काम करण्याची मुख्यमंत्र्यांना सवय.
  • भाजप आमदार ठेकेदाराला खंडणी मागतात त्यांना मुख्यमंत्र्यांची भीती नाही.
  • फडणवीस गृहमंत्री मात्र नागपूर गुन्हेगारांची राजधानी बनविली आहे.

 

या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री मनोहर नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री फौजिया खान, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार