शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

पाणीटंचाईच्या नावानं गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 21:56 IST

संपूर्ण यवतमाळ शहर भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. अशा स्थितीत काहींनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. गोरगरीब कुटुंब पाणी विकत घेऊ शकत नाही. अशांना मदत करण्यासाठी आम्ही झटतोय, असा देखावा करून बकळ अशी लोकवर्गणी दात्यांकडून जमा केली जात आहे.

ठळक मुद्देनवीन फंडा : अंधार होताच टँकरवर लागतात बॅनर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहर भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. अशा स्थितीत काहींनी स्वत:चे उखळ पांढरे करण्यास सुरुवात केली आहे. गोरगरीब कुटुंब पाणी विकत घेऊ शकत नाही. अशांना मदत करण्यासाठी आम्ही झटतोय, असा देखावा करून बकळ अशी लोकवर्गणी दात्यांकडून जमा केली जात आहे. टंचाई वेगवेगळ्या पद्धतीने कॅश करण्याचा नवीन फंडा काहींनी शोधला आहे.पाणी हे जीवन आहे. त्याचं दान करून पुण्य कमावण्यासाठी अनेकजण दातृत्वाचा भाव घेवून झटत आहे. काहींनी तर या टंचाईतही स्वत:कडे असलेले पाण्याचे साठे मोफत उपलब्ध करून दिले आहे. शक्य होईल तेवढ्यांना पाणी पुरविण्याची जबाबदारी माणुसकी म्हणून केली जात आहे. मात्र यालाही अपवाद ठरणारे महाभाग टाळूवरचं लोणी खाण्याच्या मानसिकतेतून पाणीटंचाईत स्वत:ची चांदी कशी होईल यासाठी व्यूहरचना आखत आहे. यामध्ये सामाजिक समतेचा डांगोरा पिटणारे तसेच लोकनेता असलेल्याचे भासविणारे काही नगरसेवकही समाविष्ट आहे. पालिकेकडून मिळालेले टँकर फिरल्यानंतर रात्री त्यावर स्वत:च्या नावाचे फलक लावून पाण्याचे वाटप केले जाते. काही ठिकाणी तर परस्परच शासकीय खर्चाने भरलेल्या टँकरची रोखीत विक्री केली जाते. हा गोरखधंदा सध्या जोरात असून गोरगरीबांच्या पाण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात चंदा वसूल केला जात आहे.नगरपरिषदेच्या पाण्याचे स्त्रोत झपाट्याने कोरडे पडत असले तरी बांधकामासाठी विशिष्ट वेळेनंतर टँकर भरून त्याची विक्री केली जात आहे. यासाठी एक टोळके सक्रिय झाले असून टंचाईच्या काळात स्वत:ची झोळी भरण्यात मग्न आहेत. अशा संधीसाधूमुळे प्रामाणिकपणे काम करणारा कर्मचारीवर्ग, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो. टंचाईने सर्वच जण तणावग्रस्त असून मानापमान सहन करून अनेक घटक सेवा देण्यात व्यस्त आहेत. दुर्दैवाने त्यांच्या भरोशावर दुकानदारी करणारे पैसा गोळा करताना दिसत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई